शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठीच साेमय्यांची ढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST

अकाेला : केंद्रातील माेदी सरकार हे शेतकरी, कामगार व बेराेजगारांच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरले आहे. महागाईने सामान्य व्यक्ती हाेरपळून ...

अकाेला : केंद्रातील माेदी सरकार हे शेतकरी, कामगार व बेराेजगारांच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरले आहे. महागाईने सामान्य व्यक्ती हाेरपळून निघत आहे. हे सर्व अपयश झाकण्यासाठीच भाजपाने प्रत्येक राज्यात किरीट साेमय्या यांच्यासारखी उपद्रवी माणसे पेरली आहेत. सामान्य जनतेचे लक्ष विचलित व्हावे याकरिताच साेमय्यांचा ढालीसारखा वापर केला जात असल्याचा आराेप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केला.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी ते अकाेल्यात दाखल झाले. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. पटाेले म्हणाले की, विराेधक आराेप करत असतात. ताे त्यांच्या अधिकारच आहे. मात्र, साेमय्यांना समाेर करून भाजपाने खालच्या पातळीवरच राजकारण सुरू केले आहे. हा सर्व प्रकार केंद्रातील अपयश झाकण्यासाठीच असल्याचा घणाघात त्यांनी केला. दाेषींवर कारवाई झालीच पाहिजे. त्याची पाठराखण करण्याचा प्रश्नच नाही. मात्र, सुपारी घेतल्यासारखे आराेपांचे सुरू असलेले सत्र पाहता भाजपाची ही खेळी असल्याचेही ते म्हणाले. केंद्राचे अपयश जनतेपर्यंत पाेहोचविण्यासाठी उद्याच्या बंद माध्यमातून केंद्र सरकारविरोधात नवी लढाई सुरू करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून त्यांनी संबंधित कंपनीला जबाबदार धरले असून या प्रकारात दाेषींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली असून विद्यार्थ्यांना मदत करण्यासंदर्भात सरकारशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गडकरींची खासदारकी जाईलच

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. आपण उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील पुराव्यांच्या आधारावर गडकरींची खासदारकी जाईल, असा पुनरूच्चार नाना पटोले यांनी केला. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते. पटोले जिल्हा परिषद पोटनिवडणूक प्रचारासाठी आज अकोला जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. गडकरींची याचिका बेकायदेशीर असल्याचा न्यायालयातील दावा चुकीचा असल्याचे पटोले म्हणाले. गडकरींशी वैयक्तिक मतभेद नाहीत. ही विचारांची लढाई असल्याचेही त्यांनी सांगितले.

ती भेट राजकीय शिष्टाचार

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण आणि बाळासाहेब थोरात फडणवीसांनाही भेटण्यात काहीच गैर नाही. निवडणूक बिनविराेध करण्यासाठी अशा भेटी हा राज शिष्टाचाराचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रभाग रचनेत बदल हाेईल

महापालिकेसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेच्या विषयावर काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आमच्या प्रयत्न आलेल्या प्रतिक्रियांच्या ही जनभावना आहे. त्यामुळे आम्ही ठराव घेऊन द्विसदस्यीय प्रभाग रचना करण्याबाबत सरकारला विनंती केली आहे आणि तसा बदल हाेईल अशी खात्री असल्याचे पटाेले म्हणाले.