शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

एकाच हंगामात पिकांना अल्प आणि अतिवृष्टीचाही फटका

By admin | Updated: August 13, 2015 22:55 IST

पावसाच्या दडीने वाढ खुंटली, आता अतिपावसाने पिके पडताहेत पिवळी.

अकोला : पावसाने दिलेली एक महिन्याची दडी आणि या दडीनंतर सातत्याने सुरू असलेला पाऊस; परिणामी एकाच हंगामात अल्पवृष्टी आणि अतवृष्टीचाही फटका पिकांना सोसावा लागला आहे. पावसाने ऐन हंगामात तब्बल एक महिना दडी दिल्याने पिकांची वाढ खुंटली असून, आता सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. दोन्ही परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर पावसाने एक महिना दडी दिली. पिकांना पाणी मिळाले नसल्यामुळे फांद्या व पानांची आवश्यक प्रमाणात वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली व फुलोरा कमी प्रमाणात आला. त्यावेळी पिकांना पावसाची नितांत गरज होती. त्यामुळे शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत होते; मात्र पावसाने साथ दिली नाही. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली आणि गत तेरा दिवसांमध्ये ४00 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे, त्याचा विपरीत परिणाम होऊन पिके पिवळी पडत आहेत. झाडांना आलेला फुलोरा पावसामुळे झडत आहे. त्यामुळे हा पाऊस पिकांसाठी नुकसानदायक ठरत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली आहे.; मात्र सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पिके पिवळी पडत आहे. सोयाबीनवर उंट अळी व तंबाखूची पाने खाणार्‍या अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. शेतकर्‍यांनी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले. *विविध किडींचा हल्ला सोयाबीन पिकावर सध्या उंट अळी व तंबाखूची पाने खाणार्‍या अळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे. पिके लहान व झाडांना पाणी कमी असल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी असला, तरी नुकसान मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्यता आहे.