शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेड आता उतरणार राजकारणात!

By admin | Updated: August 31, 2015 01:34 IST

प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्याशी बातचीत.

अकोला : परिवर्तनवादी चळवळीच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते वेगवेगळ्य़ा पक्षात जात असतील, तर हे चळवळीचे अपयश आहे. पुरोगामी चळवळीत परिपक्व झालेल्या कार्यकर्त्यांंनी राजकीय चळवळ गतिमान करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पावले उचलली असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे शंभर टक्के समाजकारण व राजकारण या शिवसूत्राची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी राजकारणात उतरत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी अकोला येथे 'लोकमत'शी बोलताना दिली.मराठा सेवा संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आखरे रविवारी अकोल्यात आले होते, तेव्हा त्यांनी संभाजी ब्रिगेडने राजकारणासह पाच सूत्री कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगितले.

प्रश्न-समाजकारण व राजकारण कसे करणार?उत्तर- मराठा, बहुजन समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्याची खरी गरज आहे. संभाजी ब्रिगेड ते करीत आहेच, पण राजकीय सत्तेच्या माध्यमातून यात आमूलाग्र बदल घडवून आणता येतो. हे तितकेच सत्य आहे . पुरागोमी चळवळीतील कार्यकर्त्यांंना इतर राजकीय पक्षात त्या पक्षाच्या अजेंड्यानुसार काम करावे लागते. येथे मात्र त्यांचा शंभर टक्के पुरोगामी चळवळीला गतिमान करण्यास मोठा हात भार लागणार आहे.

प्रश्न-राजकीय चळवळीची सुरुवात केली का? उत्तर- ग्रामपंचायत निवडणुकीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांंनी चांगली कामगिरी केली. बुलडाणा जिल्हय़ात चांगले चित्र आहे. राजकीय चळवळीला अधिक व्यापक करण्यासाठी योजना आखली जात आहे. सध्या शेतकर्‍यांचे प्रश्न हाती घेतले आहेत. मराठवाड्यात शेतकरी मेळावे, मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चाला शेतकर्‍यांचा उत्स्फू र्त प्रतिसाद लाभत आहे.

प्रश्न- पाचसूत्री कार्यक्रम कोणता ?उत्तर- मराठा-बहुजन समाजाला प्रगतीची कवाडे उघडायची असतील तर शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याची गरज असून, या क्षेत्रात आपले विचाराचे लोक येणे गरजेचे आहे. म्हणजेच शिक्षण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण आणि प्रचार, प्रसार माध्यम सत्ता बहुजन समाजाच्या हाती येणे गरजेचे आहे. हेच आमचे ध्येय असून, त्यादृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे.

प्रश्न- बहुजन समाजाला एकत्र कसे करणार? उत्तर- राज्यात आम्ही परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून समोर आल्याने इतर सर्वच पुरोगामी चळवळीला बळ मिळालं आहे. आता मराठा समाज ताकदीने पुढे येत असूून, या चळवळीत स्वत:ला झोकून देत आहे. खरे तर मराठय़ांचा या अगोदर गैरवापर झाला. त्यांच्यात सरंजामशाहीचा अविर्भाव ठासून भरवला होता, पण आम्ही तो अविर्भाव वैचारिक प्रबोधनातून काढला, काढत आहोत. बहुजन समाजाला जोडताना, आम्ही मराठा समाजातील पोट जातींचा बिमोड करण्यासाठी पाऊल टाकले आहे. आंतरजातीय विवाह, विधवा विवाह घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला यशही येत आहे.

प्रश्न- वैचारिक प्रबोधन नेमके कोणतं करता?उत्तर- या देशाला प्रगतीकडे नेणार्‍या पुरोगामी महामानवांचे विचार समाजापर्यंंत नेण्याचे काम करीत असून, सर्व समाज एकत्र कसा नांदेल आणि प्रत्येकाला समान न्याय कसा मिळेल, हा आमचा उद्देश आहे. कर्मकांड, अंधश्रद्धेतून हा समाज बाहेर काढण्यासाठी त्यांच्या समोर पर्याय ठेवत आहोत. प्रवास खडतर आहे, पण तो करावाच लागणार आहे.