शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

संभाजी ब्रिगेड आता उतरणार राजकारणात!

By admin | Updated: August 31, 2015 01:34 IST

प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्याशी बातचीत.

अकोला : परिवर्तनवादी चळवळीच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते वेगवेगळ्य़ा पक्षात जात असतील, तर हे चळवळीचे अपयश आहे. पुरोगामी चळवळीत परिपक्व झालेल्या कार्यकर्त्यांंनी राजकीय चळवळ गतिमान करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पावले उचलली असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे शंभर टक्के समाजकारण व राजकारण या शिवसूत्राची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी राजकारणात उतरत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी अकोला येथे 'लोकमत'शी बोलताना दिली.मराठा सेवा संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आखरे रविवारी अकोल्यात आले होते, तेव्हा त्यांनी संभाजी ब्रिगेडने राजकारणासह पाच सूत्री कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगितले.

प्रश्न-समाजकारण व राजकारण कसे करणार?उत्तर- मराठा, बहुजन समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्याची खरी गरज आहे. संभाजी ब्रिगेड ते करीत आहेच, पण राजकीय सत्तेच्या माध्यमातून यात आमूलाग्र बदल घडवून आणता येतो. हे तितकेच सत्य आहे . पुरागोमी चळवळीतील कार्यकर्त्यांंना इतर राजकीय पक्षात त्या पक्षाच्या अजेंड्यानुसार काम करावे लागते. येथे मात्र त्यांचा शंभर टक्के पुरोगामी चळवळीला गतिमान करण्यास मोठा हात भार लागणार आहे.

प्रश्न-राजकीय चळवळीची सुरुवात केली का? उत्तर- ग्रामपंचायत निवडणुकीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांंनी चांगली कामगिरी केली. बुलडाणा जिल्हय़ात चांगले चित्र आहे. राजकीय चळवळीला अधिक व्यापक करण्यासाठी योजना आखली जात आहे. सध्या शेतकर्‍यांचे प्रश्न हाती घेतले आहेत. मराठवाड्यात शेतकरी मेळावे, मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चाला शेतकर्‍यांचा उत्स्फू र्त प्रतिसाद लाभत आहे.

प्रश्न- पाचसूत्री कार्यक्रम कोणता ?उत्तर- मराठा-बहुजन समाजाला प्रगतीची कवाडे उघडायची असतील तर शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याची गरज असून, या क्षेत्रात आपले विचाराचे लोक येणे गरजेचे आहे. म्हणजेच शिक्षण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण आणि प्रचार, प्रसार माध्यम सत्ता बहुजन समाजाच्या हाती येणे गरजेचे आहे. हेच आमचे ध्येय असून, त्यादृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे.

प्रश्न- बहुजन समाजाला एकत्र कसे करणार? उत्तर- राज्यात आम्ही परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून समोर आल्याने इतर सर्वच पुरोगामी चळवळीला बळ मिळालं आहे. आता मराठा समाज ताकदीने पुढे येत असूून, या चळवळीत स्वत:ला झोकून देत आहे. खरे तर मराठय़ांचा या अगोदर गैरवापर झाला. त्यांच्यात सरंजामशाहीचा अविर्भाव ठासून भरवला होता, पण आम्ही तो अविर्भाव वैचारिक प्रबोधनातून काढला, काढत आहोत. बहुजन समाजाला जोडताना, आम्ही मराठा समाजातील पोट जातींचा बिमोड करण्यासाठी पाऊल टाकले आहे. आंतरजातीय विवाह, विधवा विवाह घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला यशही येत आहे.

प्रश्न- वैचारिक प्रबोधन नेमके कोणतं करता?उत्तर- या देशाला प्रगतीकडे नेणार्‍या पुरोगामी महामानवांचे विचार समाजापर्यंंत नेण्याचे काम करीत असून, सर्व समाज एकत्र कसा नांदेल आणि प्रत्येकाला समान न्याय कसा मिळेल, हा आमचा उद्देश आहे. कर्मकांड, अंधश्रद्धेतून हा समाज बाहेर काढण्यासाठी त्यांच्या समोर पर्याय ठेवत आहोत. प्रवास खडतर आहे, पण तो करावाच लागणार आहे.