शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

पहिल्याच दिवशी ३0 लाखांच्या रेल्वे आरक्षण तिकिटांची विक्री

By admin | Updated: April 2, 2015 01:59 IST

‘वेटिंग’मुळे तिकीट वा प्रवास रद्द करण्याचे प्रमाण होणार कमी.

अकोला : भारतीय रेल्वे प्रशासनाने तिकीट आरक्षणाचा अवधी ६0 दिवसांवरून १२0 दिवसांवर नेण्याचा निर्णय ३१ मार्च रोजी घेतला. ही योजना १ एप्रिलपासून देशभरात एकाच वेळी कार्यान्वित झाली. यापुढे रेल्वेने प्रवासाचे बेत आखणार्‍या प्रवाशांना चार महिने अगोदर तिकीट आरक्षित करता येणार आहे. तर योजना कार्यान्वित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अकोला रेल्वे स्थानकावर ३0 लाखांच्या रेल्वे आरक्षण तिकिटांची विक्री झाल्याची माहिती आहे.पूर्वीच्या तुलनेत भारतीय रेल्वेचे जाळे देशात सर्वदूर पसरले आहे. पूर्वी एका ठिकाणाहून दुसर्‍या दूरच्या ठिकाणी जाताना प्रवाशांना अनेक ठिकाणी गाड्या बदलाव्या लागत होत्या. पूर्वीच्या सर्व अडचणींवर मात करीत उदयास आलेल्या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीमुळे देशाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या रेल्वे मार्गातील हे सर्व अडथळे दूर झाले. अद्ययावत सेवा-सुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वे प्रशासन विविध बदल करीत आहेत. प्रवासाचे बेत आखणार्‍या प्रवाशांना पूर्वी ६0 दिवस अर्थात दोन महिने अगोदर रेल्वे तिकिटाचे आरक्षण करता येत होते. प्रवासाच्या दिवसापर्यंंत तिकीट कन्फर्म होण्यासाठी वाट पाहणार्‍या प्रवाशांना ह्यवेटिंगह्णमुळे एक तर अडचणीचा ठरणारा प्रवास करावा लागत होता, नाही तर तिकीट रद्द करून प्रवासाचे बेत बदलावे लागत होते. त्यातच मध्यंतरीच्या काळात तिकीट कन्फर्म नसलेल्या प्रवाशांना आरक्षित डब्यात प्रवास करता येणार नाही, असा फतवादेखील रेल्वे प्रशासनाने काढला. यामुळे पूर्णत: अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सरसकट १२0 दिवस अगोदर म्हणजे तब्बल चार महिन्यांपूर्वी रेल्वे तिकिटाचे आरक्षण करण्याची योजना १ एप्रिलपासून प्रवाशांसाठी संपूर्ण देशभरात एकाच वेळी कार्यान्वित केली. यामुळे आरक्षण तिकीट ह्यवेटिंगह्णवर असलेल्या बहुतांश प्रवाशांवर तिकीट वा प्रवास यापैकी काहीही रद्द करण्याची वेळ येणार नाही.