शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ग्रामीण रस्ते देखभाल, दुरुस्ती धोरणाला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:14 IST

ग्रामीण मार्गांची अवस्था बिकट असताना जिल्हा परिषदांनी तयार केलेला कृती आराखडा कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागातील खेड्यांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची बाब सामाजिक, आर्थिक सुधारणेशी संबंधित असली तरी ती जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदांनी या जीवन-मरणाच्या मुद्याला हरताळ फासल्याचे चित्र आहे. सर्वच ग्रामीण मार्गांची अवस्था बिकट असताना जिल्हा परिषदांनी तयार केलेला कृती आराखडा कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, शासनाने आॅगस्ट २०१९ मध्ये राज्याचे ग्रामीण रस्ते परिरक्षा धोरण निश्चित केले असतानाही त्याला ‘खो’ दिला जात आहे. ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम रस्ते असणे, ही मूलभूत गरज आहे. त्यामुळे रस्त्यांची नियमितपणे देखभाल-दुरुस्ती (परिरक्षा) करणे, यासाठी ग्रामविकास विभागाने धोरण तयार केले आहे. त्या धोरणानुसार कृती आराखडा तयार करणे, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांची आहे; मात्र या धोरणानुसार रस्त्यांची देखभाल-दुरुस्तीचा आराखडा अनेक जिल्हा परिषदांनी अद्यापही तयार केला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे सरत्या पावसाळ्यात रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाल्यानंतरही शासनाच्या धोरणानुसार दुरुस्तीची कामे सुरू झालेली नाहीत. त्याचा त्रास ग्रामीण भागातील जनतेला सहन करावा लागत आहे. राज्यातील एकूण २ लाख ३ हजार ९९४ किमीच्या रस्ते दुरुस्तीसाठी हे धोरण ठरविण्यात आले आहे.रस्ते दुरुस्तीचे निकषरस्त्यांच्या पृष्ठभागावर कोणत्याही स्वरूपाचा बिघाड, पावसामुळे व रहदारीमुळे निर्माण झालेले खड्डे, तडे, आकारातील बिघाड, विघटन यासारखी कामे तातडीने करण्याचे धोरणात बजावले आहे.रस्ते धोरणानुसार करावयाची कामे

 

  •  रस्त्यांचा उपयोग करणाऱ्यांसाठी सुरक्षित, कार्यक्षम पोहोच रस्ते तयार ठेवणे, त्यासाठी दुरुस्ती करणे.
  •  ग्रामीण रस्ते मत्ता म्हणून सुरक्षित ठेवणे.
  •  ग्रामीण रस्त्यांचा अनुशेष दूर करण्याची कृती योजना.
  •  रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी पुरविणे. परिणामकारक दुरुस्ती पद्धती वापरणे.
टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद