शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सत्ताधाऱ्यांना सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:21 IST

शहरात दैनंदिन तयार हाेणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया हाेत नसल्यामुळे नायगाव भागातील हातपंप, सबमर्सिबल पंप, विहिरीचे पाणी दूषित झाल्याची परिस्थिती आहे. ...

शहरात दैनंदिन तयार हाेणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया हाेत नसल्यामुळे नायगाव भागातील हातपंप, सबमर्सिबल पंप, विहिरीचे पाणी दूषित झाल्याची परिस्थिती आहे. उन्हाळ्यात कचऱ्याला आग लागत असल्यामुळे व धुरामुळे हवेचे प्रदूषण हाेत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांचा जीव धाेक्यात आला आहे. यावर उपाय म्हणून ‘स्वच्छ भारत’ अभियानामध्ये घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र शासनाने ४५ काेटींचा निधी मंजूर केला. प्रकल्प उभारण्यासाठी भाेड गावालगतच्या ई-क्लास जमिनीची निवड करण्यात आली. शहराच्या हिताचा असलेल्या या प्रकल्पातील तांत्रिक अटी दूर करणे प्रशासनाकडून अपेक्षित हाेते. मनपाने प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध केली असता त्यामध्ये ई-क्लास जमिनीवरील खदानीचा उल्लेख न करता निविदा प्रसिद्ध केली. मे. परभणी ॲग्राेटेक प्रा.लि. कंपनीची एक टक्का कमी दराची निविदा स्वीकारून मनपाचे उपायुक्त वैभव आवारे यांनी सप्टेंबर महिन्यात कंपनीला कार्यारंभ आदेश दिला.

‘डीपीआर’संशयाच्या घेऱ्यात!

घनकचऱ्याचा प्रकल्प अहवाल तयार करणाऱ्या एजन्सीने अहवालात खदानचा उल्लेख केला नसल्याने प्रत्यक्षात जागेची पाहणी न करता ‘डीपीआर’ची प्रक्रिया कागदाेपत्री झाल्याचे समाेर आले आहे. ही खदान बुजविण्यासाठी सहा ते सात काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा प्रस्ताव मनपाने १६ डिसेंबर राेजीच्या सर्वसाधारण सभेत सादर केला हाेता.

गटनेत्यांना निमंत्रण दिलेच नाही!

घनकचरा प्रकल्पात अनेक त्रुटी असल्याचे समाेर आल्यामुळे सत्ताधारी भाजपची काेंडी झाली आहे. ही काेंडी फाेडण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्यांसाेबत बैठक घेण्याचा सत्तापक्षाचा मानस हाेता. एक महिना उलटून गेल्यावरही गटनेत्यांना बैठकीचे निमंत्रण नसल्याची माहिती आहे.