शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ सोडत तिकिट विक्रीचे निकष बदलले

By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST

लोकमत इम्पॅक्ट; तिकिट खरेदीची बंधनं शिथील; शासनाने काढला नव्याने आदेश.

राजेश शेगोकार/बुलडाणा : महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ न्यू ईयर सोडतीची ५ हजार तिकिटे खरेदीचे बंधन राज्य शासनाने टाकल्यामुळे राज्यातील एकाही विक्रेत्याने तिकिटाची उचल केली नव्हती. त्यामुळे ही सोडतच रद्द होण्याचा मार्गावर असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने ३0 डिसेंबर रोजी प्रकाशीत केल्यानंतर शासनाला जाग आली असून, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी वित्तविभागाने आदेश काढून तिकिटाच्या खरेदीबाबत २४ नोव्हेंबर रोजी काढलेला अध्यादेश रद्द करून जुनेच धोरण कायम ठेवले आहे. राज्याच्या अल्पबचत संचालनालयाच्या वतिने महाराष्ट्र राज्य लॉटरीची नाताळ न्यू ईयर सोडतीचे दरवर्षी आयोजन केले जाते. यावर्षीसुद्धा ५ जानेवारीला नाताळ न्यू ईयर सोडत काढली जाणार होती. त्यासाठी राज्य शासनाच्या अल्पबचत संचालनालयाच्या वतिने ४ लाख तिकिटे छापण्यात आली; मात्र या तिकीटाच्या विक्रीबाबत २४ नोव्हेंबर रोजी वित्त विभाग तसेच अल्पबचत लॉटरी संचालनालयाचे कक्षाधिकारी माधव आव्हाड यांच्या सहीने अध्यादेश जारी करण्यात आला. या अध्यादेशामध्ये लॉटरी विक्रेत्यांना किमान ५ हजार तिकिटे खरेदी करण्याचे बंधन टाकण्यात आले. यासोबतच विक्रेत्यांना मिळणार्‍या कमीशनबाबतही नव्याने नियम घोषीत करण्यात आले. पूर्वी ५00 ते ४९ हजार ९९९ तिकीटांच्या खरेदीवर विक्रेत्यांना २0 टक्के कमीशन दिले जात होते. २४ नोव्हेंबरच्या अध्यादेशानुसार ५ हजार ते १ लाख तिकिटाच्या खरेदीवर २0 टक्के कमीशन ठेवण्यात आले. शंभर रूपये किमतीच्या ५00 तिकिटांची खरेदी करणार्‍या सामान्य विक्रेत्यालाही किमान ५ हजार तिकिटांची खरेदी करणे बंधनकारक झाल्याने त्यांना आर्थिकदृष्टया ही बाब परवडणारी नसल्याने एकाही विक्रेत्यांने तिकिटांची उचल केली नाही. ही बाब ह्यलोकमतह्ण ने प्रकाशीत करताच वित्तविभागाने तत्काळ दखल घेत १ जानेवारी रोजी सुधारित आदेश काढला आहे. यामध्ये ५00 ते ५0 हजार तिकिट खरेदी करणार्‍या एजंटांना पूर्ववत २0 टक्के कमीशन कायम ठेवण्यात आले असून, कमीशनचे स्वरूप नियमित सोडतीप्रमाणेच ठेवले आहे.

आता सोडत झाली तरी शासनाला तोटा

         वित्त विभाग तसेच अल्पबचत लॉटरी संचालनालयाच्या नियमानुसार प्रत्येक सोडतीनुसार कराचा भरणा शासनाच्या तिजोरीत करावा लागतो. त्यामुळे आता नव्या अध्यादेशनुसार तिकीटे विक्री झाली तरी करापोटी शासनाकडे तब्बल १२ लाख रूपये अल्पबचत संचालनालयाला भरावे लागणारच आहेत. नाताळ न्यू ईयर सोडत ५ जानेवारी रोजी होणार असून तिकीटासंदर्भात नवा आदेश १ जानेवारी दूपारी ३ वाजता काढण्यात आला. त्यामुळे २ जानेवारी व ४ जानेवारी हे दोन दिवस कामकाजाचे असल्याने किती तिकीटांची विक्री होईल, याबाबत संशय कायमच आहे. सण उत्सवाच्या निमित्ताने निघणारी विशेष सोडत मंगळवारी असेल तर त्या दिवशी निघणारी साप्ताहीक सोडत रद्द करण्याचा नियम असल्याने शासनाच्या महसुलाचा दूहेरी तोटा होणारच आहे.