शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

विदर्भ राज्य करा; अन्यथा जनक्षोभास सामोरे जा!

By admin | Updated: November 6, 2016 02:04 IST

वामनराव चटप यांचा इशारा; ५ डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा.

अकोला, दि. ५- केंद्र सरकारने दिलेले आश्‍वासन पाळून विलंब न लावता तातडीने विदर्भ राज्य निर्माण करावे, अन्यथा १ जानेवारीनंतर विदर्भातील जनक्षोभास सामोरे जावे लागेल, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष, माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी शनिवारी येथे दिला. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ५ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गत चार वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी अनेक आंदोलने केली; परंतु केंद्र सरकारने आजपर्यंंत त्या दिशेने एकही पाऊल पुढे टाकले नाही. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग यांना वेळ मागितला; परंतु अद्याप वेळ देण्यात आला नसून, निवेदने व पत्रांचे साधे उत्तरदेखील अद्यापर्यंत देण्यात आले नाही. केंद्रातील भाजपच्या सरकारने विदर्भ राज्याबाबत दिलेल्या आश्‍वासनासंदर्भात किती असंवेदनशील आहे, हे यावरून लक्षात येते. तसेच जनतेच्या प्रश्नांची सरकार कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोपही चटप यांनी केला. विदर्भ राज्याची निर्मिती आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या या प्रश्नावर आता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने आरपारची लढाई लढण्यात येणार असून, त्यामध्ये ५ डिसेंबर रोजी नागपूरच्या विधान भवनावर मोर्चा व ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन यावर्षीचे शेवटचे आंदोलन राहणार असून,१ जानेवारीपासून ह्यविदर्भ मिळवू औदाह्ण या घोषणेप्रमाणे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योत्स्ना बहाळे, युवा आघाडी अध्यक्ष डॉ. मनीष खंडारे, जिल्हा समन्वयक सतीश देशमुख, विभागप्रमुख प्रशांत गावंडे, जिल्हा सचिव धनंजय मिश्रा, अविनाश नाकट, कृष्णराव पाटील, राजाभाऊ देशमुख, मनोहर माहोरे, सुरेश जोगळे,प्रशांत नागे, बाळासाहेब वसू उपस्थित होते.सरकार निर्णय घेत नाही; भाजप नेत्यांचेही मौन!सरकारने वैदर्भीय जनतेला दिलेले विदर्भ राज्याचे आश्‍वासन, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर दिलेले आश्‍वासन, विदर्भात शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या या सर्वच प्रश्नांवर केंद्र सरकार कोणतेही निर्णय घेत नाही आणि यासंदर्भात विदर्भातील भाजपाचे नेतेही मौन पाळत असल्याचा आरोप वामनराव चटप यांनी केला.पाच ठिकाणाहून निघणार विदर्भ दिंडी!विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूरच्या विधान भवनावर ५ डिसेंबर रोजी मोर्चा व ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबत जनजागृतीसाठी विदर्भाच्या पाच सीमेवरून १ डिसेंबर रोजी विदर्भ दिंडी काढण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिली दिंडी सिंदखेडराजा, दुसरी दिंडी उमरखेड, तिसरी दिंडी देवरी, चौथी दिंडी शेंडगाव व पाचवी दिंडी कालेश्‍वर येथून निघणार आहे.