शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

विदर्भ राज्य करा; अन्यथा जनक्षोभास सामोरे जा!

By admin | Updated: November 6, 2016 02:04 IST

वामनराव चटप यांचा इशारा; ५ डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा.

अकोला, दि. ५- केंद्र सरकारने दिलेले आश्‍वासन पाळून विलंब न लावता तातडीने विदर्भ राज्य निर्माण करावे, अन्यथा १ जानेवारीनंतर विदर्भातील जनक्षोभास सामोरे जावे लागेल, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष, माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी शनिवारी येथे दिला. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ५ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गत चार वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी अनेक आंदोलने केली; परंतु केंद्र सरकारने आजपर्यंंत त्या दिशेने एकही पाऊल पुढे टाकले नाही. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग यांना वेळ मागितला; परंतु अद्याप वेळ देण्यात आला नसून, निवेदने व पत्रांचे साधे उत्तरदेखील अद्यापर्यंत देण्यात आले नाही. केंद्रातील भाजपच्या सरकारने विदर्भ राज्याबाबत दिलेल्या आश्‍वासनासंदर्भात किती असंवेदनशील आहे, हे यावरून लक्षात येते. तसेच जनतेच्या प्रश्नांची सरकार कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोपही चटप यांनी केला. विदर्भ राज्याची निर्मिती आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या या प्रश्नावर आता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने आरपारची लढाई लढण्यात येणार असून, त्यामध्ये ५ डिसेंबर रोजी नागपूरच्या विधान भवनावर मोर्चा व ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन यावर्षीचे शेवटचे आंदोलन राहणार असून,१ जानेवारीपासून ह्यविदर्भ मिळवू औदाह्ण या घोषणेप्रमाणे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योत्स्ना बहाळे, युवा आघाडी अध्यक्ष डॉ. मनीष खंडारे, जिल्हा समन्वयक सतीश देशमुख, विभागप्रमुख प्रशांत गावंडे, जिल्हा सचिव धनंजय मिश्रा, अविनाश नाकट, कृष्णराव पाटील, राजाभाऊ देशमुख, मनोहर माहोरे, सुरेश जोगळे,प्रशांत नागे, बाळासाहेब वसू उपस्थित होते.सरकार निर्णय घेत नाही; भाजप नेत्यांचेही मौन!सरकारने वैदर्भीय जनतेला दिलेले विदर्भ राज्याचे आश्‍वासन, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर दिलेले आश्‍वासन, विदर्भात शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या या सर्वच प्रश्नांवर केंद्र सरकार कोणतेही निर्णय घेत नाही आणि यासंदर्भात विदर्भातील भाजपाचे नेतेही मौन पाळत असल्याचा आरोप वामनराव चटप यांनी केला.पाच ठिकाणाहून निघणार विदर्भ दिंडी!विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूरच्या विधान भवनावर ५ डिसेंबर रोजी मोर्चा व ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबत जनजागृतीसाठी विदर्भाच्या पाच सीमेवरून १ डिसेंबर रोजी विदर्भ दिंडी काढण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिली दिंडी सिंदखेडराजा, दुसरी दिंडी उमरखेड, तिसरी दिंडी देवरी, चौथी दिंडी शेंडगाव व पाचवी दिंडी कालेश्‍वर येथून निघणार आहे.