शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

विदर्भ राज्य करा; अन्यथा जनक्षोभास सामोरे जा!

By admin | Updated: November 6, 2016 02:04 IST

वामनराव चटप यांचा इशारा; ५ डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा.

अकोला, दि. ५- केंद्र सरकारने दिलेले आश्‍वासन पाळून विलंब न लावता तातडीने विदर्भ राज्य निर्माण करावे, अन्यथा १ जानेवारीनंतर विदर्भातील जनक्षोभास सामोरे जावे लागेल, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष, माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी शनिवारी येथे दिला. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ५ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गत चार वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी अनेक आंदोलने केली; परंतु केंद्र सरकारने आजपर्यंंत त्या दिशेने एकही पाऊल पुढे टाकले नाही. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग यांना वेळ मागितला; परंतु अद्याप वेळ देण्यात आला नसून, निवेदने व पत्रांचे साधे उत्तरदेखील अद्यापर्यंत देण्यात आले नाही. केंद्रातील भाजपच्या सरकारने विदर्भ राज्याबाबत दिलेल्या आश्‍वासनासंदर्भात किती असंवेदनशील आहे, हे यावरून लक्षात येते. तसेच जनतेच्या प्रश्नांची सरकार कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोपही चटप यांनी केला. विदर्भ राज्याची निर्मिती आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या या प्रश्नावर आता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने आरपारची लढाई लढण्यात येणार असून, त्यामध्ये ५ डिसेंबर रोजी नागपूरच्या विधान भवनावर मोर्चा व ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन यावर्षीचे शेवटचे आंदोलन राहणार असून,१ जानेवारीपासून ह्यविदर्भ मिळवू औदाह्ण या घोषणेप्रमाणे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योत्स्ना बहाळे, युवा आघाडी अध्यक्ष डॉ. मनीष खंडारे, जिल्हा समन्वयक सतीश देशमुख, विभागप्रमुख प्रशांत गावंडे, जिल्हा सचिव धनंजय मिश्रा, अविनाश नाकट, कृष्णराव पाटील, राजाभाऊ देशमुख, मनोहर माहोरे, सुरेश जोगळे,प्रशांत नागे, बाळासाहेब वसू उपस्थित होते.सरकार निर्णय घेत नाही; भाजप नेत्यांचेही मौन!सरकारने वैदर्भीय जनतेला दिलेले विदर्भ राज्याचे आश्‍वासन, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर दिलेले आश्‍वासन, विदर्भात शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या या सर्वच प्रश्नांवर केंद्र सरकार कोणतेही निर्णय घेत नाही आणि यासंदर्भात विदर्भातील भाजपाचे नेतेही मौन पाळत असल्याचा आरोप वामनराव चटप यांनी केला.पाच ठिकाणाहून निघणार विदर्भ दिंडी!विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूरच्या विधान भवनावर ५ डिसेंबर रोजी मोर्चा व ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबत जनजागृतीसाठी विदर्भाच्या पाच सीमेवरून १ डिसेंबर रोजी विदर्भ दिंडी काढण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिली दिंडी सिंदखेडराजा, दुसरी दिंडी उमरखेड, तिसरी दिंडी देवरी, चौथी दिंडी शेंडगाव व पाचवी दिंडी कालेश्‍वर येथून निघणार आहे.