शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कोथिंबीर शेतकऱ्यांकडून ३५ रुपये किलो, तर ग्राहकांच्या पदरात १५ रुपये पाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

अकोला : गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे भाव वाढले हाेते ; मात्र सद्यस्थितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. तरीही ग्राहकांच्या ...

अकोला : गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे भाव वाढले हाेते ; मात्र सद्यस्थितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. तरीही ग्राहकांच्या पदरात महागाईने भाजीपाला येत असल्याचे चित्र आहे. बाजारात कोथिंबीर व कारल्याचे भाव वाढले आहेत. ठोक बाजारत कोथिंबीर शेतकऱ्यांकडून ३५ रुपये किलोने विकत घेतले जाते, तर ग्राहकांच्या पदरात १५ रुपये पाव येत आहे. तसेच वांग्याचे भावही वाढल्याचे दिसून येत आहेत.

भाजी बाजारातील ठाेक भाव व चाैका-चाैकात, रस्त्यांच्या कडेला भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडील भाजीपाल्याच्या भावातील फरक हा दिसून येतो. मात्र शेतकऱ्यांकडून ग्राहकांकडे जाणाऱ्या भावात फरक दिसून येतो. दुसरीकडे आता श्रावण सुरू असल्याने उपवासाचे प्रमाण वाढत असतानाही बटाट्याचे भाव २० ते ३० रुपयांपर्यंत स्थिरावल्याचे दिसत आहे. दरम्यान टोमॅटोचे भाव कमी झाले असून, ठोक बाजारात १५० रुपयांना कॅरेट विक्री होत आहे.

भाजीपाला शेतकऱ्याचा भाव ग्राहकांना मिळणारा भाव

वांगी १५ रु (पाव ) २०

टोमॅटो १५० कॅरेट १५ (कि.)

भेंडी १०(कि.) २०(कि.)

चवळी शेंगा १५ (कि.) ३० (कि.)

कारले १५ (कि.) ६० (कि.)

कोथिंबीर ३५(कि.) ६० (कि.)

पालक ३० (कि.) ४० (कि.)

हिरवी मिरची १० (कि.) २० (कि.)

पत्ताकोबी १२ (कि) २०(कि.)

फुलकोबी ३० (कि.) ४०(कि.)

दोडके १५ (कि.) ४०(कि.)

---------------------------

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

शेतकऱ्यांकडून ठोक बाजारात भाजीपाला स्वस्तात घेतल्या जाते उलट ग्राहकांच्या पदरात महागात पडते. कधी-कधी बाहेर जिल्ह्यातून माल न आल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. त्यामुळे सरासरी खर्च हा निघून जातो. मात्र नफा तिळमात्र मिळते.

-गणेश राऊत, शेतकरी, सांगळूद.

-------------------------------

ग्राहकांना परवडेना

देशात महागाई वाढली आहे. घरगुती गॅसचे दरही वाढल्याने घरगुती बजेट कोलमडले आहे. अशातच घराच्या परिसरात मिळणारा भाजीपाला ही महागल्याने आर्थिक अडचण वाढली आहे.

- ग्राहक

------------------------

भाजीपाल्याचे दर हे बाजारात वेगळे, तर घराभोवती विक्री होणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात खूप फरक असतो. भाजीपाल्याचे दर कमी करून ग्राहकांना दिलासा द्यावा.

-ग्राहक

-----------------------------

भावात एवढा फरक का?

सीजन व बाजारातील आवक पाहून भाजीपाला स्वस्त व महाग होतो. व्यापाऱ्यांनाही काही भाजीपाल्यात उरते, तरी काही कवडीमोल भावात विक्री केल्या जाते. कोथिंबीर, कारलेंचा वाढलेला भाव हा बाजारात आवक कमी झाल्याने वाढला आहे.

-सुनील काळे, व्यापारी.