शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर शेतकऱ्यांकडून ३५ रुपये किलो, तर ग्राहकांच्या पदरात १५ रुपये पाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

अकोला : गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे भाव वाढले हाेते ; मात्र सद्यस्थितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. तरीही ग्राहकांच्या ...

अकोला : गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे भाव वाढले हाेते ; मात्र सद्यस्थितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. तरीही ग्राहकांच्या पदरात महागाईने भाजीपाला येत असल्याचे चित्र आहे. बाजारात कोथिंबीर व कारल्याचे भाव वाढले आहेत. ठोक बाजारत कोथिंबीर शेतकऱ्यांकडून ३५ रुपये किलोने विकत घेतले जाते, तर ग्राहकांच्या पदरात १५ रुपये पाव येत आहे. तसेच वांग्याचे भावही वाढल्याचे दिसून येत आहेत.

भाजी बाजारातील ठाेक भाव व चाैका-चाैकात, रस्त्यांच्या कडेला भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडील भाजीपाल्याच्या भावातील फरक हा दिसून येतो. मात्र शेतकऱ्यांकडून ग्राहकांकडे जाणाऱ्या भावात फरक दिसून येतो. दुसरीकडे आता श्रावण सुरू असल्याने उपवासाचे प्रमाण वाढत असतानाही बटाट्याचे भाव २० ते ३० रुपयांपर्यंत स्थिरावल्याचे दिसत आहे. दरम्यान टोमॅटोचे भाव कमी झाले असून, ठोक बाजारात १५० रुपयांना कॅरेट विक्री होत आहे.

भाजीपाला शेतकऱ्याचा भाव ग्राहकांना मिळणारा भाव

वांगी १५ रु (पाव ) २०

टोमॅटो १५० कॅरेट १५ (कि.)

भेंडी १०(कि.) २०(कि.)

चवळी शेंगा १५ (कि.) ३० (कि.)

कारले १५ (कि.) ६० (कि.)

कोथिंबीर ३५(कि.) ६० (कि.)

पालक ३० (कि.) ४० (कि.)

हिरवी मिरची १० (कि.) २० (कि.)

पत्ताकोबी १२ (कि) २०(कि.)

फुलकोबी ३० (कि.) ४०(कि.)

दोडके १५ (कि.) ४०(कि.)

---------------------------

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

शेतकऱ्यांकडून ठोक बाजारात भाजीपाला स्वस्तात घेतल्या जाते उलट ग्राहकांच्या पदरात महागात पडते. कधी-कधी बाहेर जिल्ह्यातून माल न आल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. त्यामुळे सरासरी खर्च हा निघून जातो. मात्र नफा तिळमात्र मिळते.

-गणेश राऊत, शेतकरी, सांगळूद.

-------------------------------

ग्राहकांना परवडेना

देशात महागाई वाढली आहे. घरगुती गॅसचे दरही वाढल्याने घरगुती बजेट कोलमडले आहे. अशातच घराच्या परिसरात मिळणारा भाजीपाला ही महागल्याने आर्थिक अडचण वाढली आहे.

- ग्राहक

------------------------

भाजीपाल्याचे दर हे बाजारात वेगळे, तर घराभोवती विक्री होणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात खूप फरक असतो. भाजीपाल्याचे दर कमी करून ग्राहकांना दिलासा द्यावा.

-ग्राहक

-----------------------------

भावात एवढा फरक का?

सीजन व बाजारातील आवक पाहून भाजीपाला स्वस्त व महाग होतो. व्यापाऱ्यांनाही काही भाजीपाल्यात उरते, तरी काही कवडीमोल भावात विक्री केल्या जाते. कोथिंबीर, कारलेंचा वाढलेला भाव हा बाजारात आवक कमी झाल्याने वाढला आहे.

-सुनील काळे, व्यापारी.