शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर शेतकऱ्यांकडून ३५ रुपये किलो, तर ग्राहकांच्या पदरात १५ रुपये पाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

अकोला : गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे भाव वाढले हाेते ; मात्र सद्यस्थितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. तरीही ग्राहकांच्या ...

अकोला : गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे भाव वाढले हाेते ; मात्र सद्यस्थितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. तरीही ग्राहकांच्या पदरात महागाईने भाजीपाला येत असल्याचे चित्र आहे. बाजारात कोथिंबीर व कारल्याचे भाव वाढले आहेत. ठोक बाजारत कोथिंबीर शेतकऱ्यांकडून ३५ रुपये किलोने विकत घेतले जाते, तर ग्राहकांच्या पदरात १५ रुपये पाव येत आहे. तसेच वांग्याचे भावही वाढल्याचे दिसून येत आहेत.

भाजी बाजारातील ठाेक भाव व चाैका-चाैकात, रस्त्यांच्या कडेला भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडील भाजीपाल्याच्या भावातील फरक हा दिसून येतो. मात्र शेतकऱ्यांकडून ग्राहकांकडे जाणाऱ्या भावात फरक दिसून येतो. दुसरीकडे आता श्रावण सुरू असल्याने उपवासाचे प्रमाण वाढत असतानाही बटाट्याचे भाव २० ते ३० रुपयांपर्यंत स्थिरावल्याचे दिसत आहे. दरम्यान टोमॅटोचे भाव कमी झाले असून, ठोक बाजारात १५० रुपयांना कॅरेट विक्री होत आहे.

भाजीपाला शेतकऱ्याचा भाव ग्राहकांना मिळणारा भाव

वांगी १५ रु (पाव ) २०

टोमॅटो १५० कॅरेट १५ (कि.)

भेंडी १०(कि.) २०(कि.)

चवळी शेंगा १५ (कि.) ३० (कि.)

कारले १५ (कि.) ६० (कि.)

कोथिंबीर ३५(कि.) ६० (कि.)

पालक ३० (कि.) ४० (कि.)

हिरवी मिरची १० (कि.) २० (कि.)

पत्ताकोबी १२ (कि) २०(कि.)

फुलकोबी ३० (कि.) ४०(कि.)

दोडके १५ (कि.) ४०(कि.)

---------------------------

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

शेतकऱ्यांकडून ठोक बाजारात भाजीपाला स्वस्तात घेतल्या जाते उलट ग्राहकांच्या पदरात महागात पडते. कधी-कधी बाहेर जिल्ह्यातून माल न आल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. त्यामुळे सरासरी खर्च हा निघून जातो. मात्र नफा तिळमात्र मिळते.

-गणेश राऊत, शेतकरी, सांगळूद.

-------------------------------

ग्राहकांना परवडेना

देशात महागाई वाढली आहे. घरगुती गॅसचे दरही वाढल्याने घरगुती बजेट कोलमडले आहे. अशातच घराच्या परिसरात मिळणारा भाजीपाला ही महागल्याने आर्थिक अडचण वाढली आहे.

- ग्राहक

------------------------

भाजीपाल्याचे दर हे बाजारात वेगळे, तर घराभोवती विक्री होणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात खूप फरक असतो. भाजीपाल्याचे दर कमी करून ग्राहकांना दिलासा द्यावा.

-ग्राहक

-----------------------------

भावात एवढा फरक का?

सीजन व बाजारातील आवक पाहून भाजीपाला स्वस्त व महाग होतो. व्यापाऱ्यांनाही काही भाजीपाल्यात उरते, तरी काही कवडीमोल भावात विक्री केल्या जाते. कोथिंबीर, कारलेंचा वाढलेला भाव हा बाजारात आवक कमी झाल्याने वाढला आहे.

-सुनील काळे, व्यापारी.