शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

रोटी अभियानातून रुग्णांच्या नातेवाइकांना भरवितात मायेचा घास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोरगरिबांना कामे सोडून रुग्णालयात भरती राहण्याची वेळ आली. यावेळी कोरोना रुग्णांची जेवणाची व्यवस्था होत आहे. मात्र, ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोरगरिबांना कामे सोडून रुग्णालयात भरती राहण्याची वेळ आली. यावेळी कोरोना रुग्णांची जेवणाची व्यवस्था होत आहे. मात्र, रुग्णांच्या काळजीपोटी दिवस-रात्र दवाखान्यात थांबणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांना जेवणाची अडचण निर्माण होत आहे. आर्थिक चणचण असल्याने दररोज जेवणाचा खर्च भागविणे कठीण होत आहे. अनेकजण उपाशीपोटीच झोपत आहेत. या गरजूंना उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये, याकरिता सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील यांनी बच्चू कडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रहार रोटी अभियान सुरू केले आहे. ते रोज सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात स्वत:च्या पैशातून दररोज अडीचशे गरजूंना अन्नदान करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, मोठ्या प्रमाणात गरजूंची भूक भागविण्याचे काम सुरू आहे. कोरोनाकाळात हे अभियान अविरत चालू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.

या अभियानाच्या माध्यमातून गरजूंना पौष्टिक अन्न देण्याचा प्रयत्न आहे. सकाळी भरपूर लोक अन्नदान करतात; परंतु सायंकाळी कोणी अन्नदान करत नाही. कोणीच उपाशीपोटी झोपू नये, यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला.

- मनोज पाटील

ही सर्वांची लढाई

कोरोना ही एकट्यादुकट्याची नव्हे तर सर्वांनी मिळून लढण्याची लढाई आहे. त्यामुळे या कार्यात सरपंच भौरद रोहित गावंडे, सागर भाकरे, श्याम क्षीरसागर, कैलास शिंदे, सय्यद नूर, कुणाल जाधव, संतोष हिरुळकर, शुभम ठाकूर, सुनील गोहर, परेश पाटील, तुषार उज्जैनकर, पिंटू साबळे, शुभम ढोले, यश गोहर, अभय डहाके व मास्टर पॉवर जीमचे मित्रमंडळ सहकार्य करीत आहे.

...तेव्हाच केला निश्चय!

काही दिवसांआधी मनोज पाटील यांची आई रुग्णालयात भरती होती. त्यावेळी त्यांच्या शेजारच्या गोरगरीब रुग्णांच्या नाते‌वाइकांचे जेवणासाठी होत असलेले हाल त्यांनी बघितले. ती व्यक्ती कधी एका कचोरीवर रात्र काढत असे, तर कधी उपाशीपोटी झोपत असे. त्यावेळी त्यांनी या गोरगरीब रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत अन्नदान करण्याचा निश्चय केला होता.

अभियानाला मिळतेय मदत

रोटी अभियानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे स्वखर्चातून सुरू असलेल्या या उपक्रमाला आता अनेक दात्यांकडून मदत मिळत आहे. कोणी आर्थिक मदत करीत आहे, तर कोणी भाजीपाला व किराणा देत आहे.