शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

वानखेडपूर शिवारातील रोहित्र एक वर्षापासून बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST

बार्शीटाकळी : तालुक्यातील सोनगिरी रस्त्यावरील वानखेडपूर शिवारातील रोहित्र तब्बल एक वर्षापासून बंद असल्याने पाणी असूनही विजेअभावी शेतकऱ्यांना पिके घेता ...

बार्शीटाकळी : तालुक्यातील सोनगिरी रस्त्यावरील वानखेडपूर शिवारातील रोहित्र तब्बल एक वर्षापासून बंद असल्याने पाणी असूनही विजेअभावी शेतकऱ्यांना पिके घेता आली नाहीत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणने तत्काळ दखल घेऊन परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी महिवतरणला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सोनगिरी रस्त्यावरील वानखेडपूर येथील रोहित्र जळाल्याने एक वर्षापासून बंद आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र आहे. शेतकरी दरवर्षी रब्बी पिके तसेच उन्हाळी पिके घेतात. मात्र यंदा रोहित्र जळाल्याने पाणी असूनही शेतकरी पिकांना पाणी देऊ शेकले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणीही केली नाही. रोहित्र बंद असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे. रोहित्र दुुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी दिल्या मात्र समस्या जैसे थे असल्याने शेतकरी वैतागले आहे. शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे निवेदने देऊन दोन दिवसांत रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. निवेदनावर युनूस मो. आझम, कादिर खान मोहम्मद खान, ए. आसिफ ए. कादिर, आशा सुधाकर ढोरे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.