शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

वानखेडपूर शिवारातील रोहित्र एक वर्षापासून बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST

बार्शीटाकळी : तालुक्यातील सोनगिरी रस्त्यावरील वानखेडपूर शिवारातील रोहित्र तब्बल एक वर्षापासून बंद असल्याने पाणी असूनही विजेअभावी शेतकऱ्यांना पिके घेता ...

बार्शीटाकळी : तालुक्यातील सोनगिरी रस्त्यावरील वानखेडपूर शिवारातील रोहित्र तब्बल एक वर्षापासून बंद असल्याने पाणी असूनही विजेअभावी शेतकऱ्यांना पिके घेता आली नाहीत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणने तत्काळ दखल घेऊन परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी महिवतरणला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सोनगिरी रस्त्यावरील वानखेडपूर येथील रोहित्र जळाल्याने एक वर्षापासून बंद आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र आहे. शेतकरी दरवर्षी रब्बी पिके तसेच उन्हाळी पिके घेतात. मात्र यंदा रोहित्र जळाल्याने पाणी असूनही शेतकरी पिकांना पाणी देऊ शेकले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणीही केली नाही. रोहित्र बंद असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे. रोहित्र दुुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी दिल्या मात्र समस्या जैसे थे असल्याने शेतकरी वैतागले आहे. शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे निवेदने देऊन दोन दिवसांत रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. निवेदनावर युनूस मो. आझम, कादिर खान मोहम्मद खान, ए. आसिफ ए. कादिर, आशा सुधाकर ढोरे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.