शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

कोठारी येथील रोहित्र दीड महिन्यांपासून बंद

By admin | Updated: August 19, 2014 01:22 IST

कोठारी बु. येथील विद्युत रोहित्र गत दीड महिन्यांपासून बंद असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

खानापूर : पातूर विद्युत उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या कोठारी बु. येथील विद्युत रोहित्र गत दीड महिन्यांपासून बंद असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी सिंचन करणे कठीण झाले आहे. त्यामुळे पिके कोमेजली आहेत. कोठारी येथील विद्युत रोहित्र बंद झाल्यानंतर स्थानिकांनी १२ जुलै रोजी ते दुरुस्त करण्याची मागणी विद्युत कंपनीच्या पातूर येथील कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे केली होती; परंतु त्याची दखल घेतल्या गेली नाही. पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी विहिरींचे पाणी देणे सुरू केले आहे; परंतु रोहित्र नादुरुस्त असल्यामुळे शेतकर्‍यांना सिंचन करणे दुरापास्त झाले आहे. पाण्याअभावी पिके सोकू लागली असून, लवकरच पाणी मिळाले नाही, तर पेरण्या उलटण्याची दाट शक्यता आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन विद्युत रोहित्र दुरुस्त करावे किंवा नवीन रोहित्र बसवावे, अशी मागणी पूर्णाजी इंगळे, हरिदास करवते, रमेश वरणकार, देवराव इंगळे, ज्ञानदेव इंगळे, भानुदास घुगे, रवींद्र करवा, शंकर घुगे यांच्यासह इतर शेतकर्‍यांनी केली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या शेतकर्‍यांनी दिला आहे.