शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

रोहणखेड परिसरात पेरणीचे नियोजन बदलणार!

By admin | Updated: July 3, 2017 01:32 IST

रोहणखेड : मृग नक्षत्रातच पाऊस रुसल्याने याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना बसत आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज असून, त्यांना आता केवळ पावसाचीच प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करोहणखेड : मृग नक्षत्रातच पाऊस रुसल्याने याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना बसत आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज असून, त्यांना आता केवळ पावसाचीच प्रतीक्षा आहे.गत पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे जोमात सुरू केली होती. सध्या शेतातील मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी पावसाळ्याला वेळेवर सुरुवात होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदीला सुरुवात केली होती. मात्र मृग नक्षत्रात सुरुवातीनंतरही पावसाचे वातावरण दिसत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी खते, बी-बियाण्यांची खरेदी थांबवली. त्यामुळे शहरातील कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांची गर्दी ओसरली आहे. मृगाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातील पेरण्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. मागीलवर्षी मृग नक्षत्रातच पाऊस पडल्याने पेरण्या लवकर आटोपल्या होत्या. यावेळी मात्र जून महिना पूर्ण आटोपला असून, पाऊस पडला नसल्याने पेरण्या कधी होतील, हे आताच ठामपणे सांगणे कठीण आहे. मूग, उडिदाच्या पेरणीचा कालावधी जात असल्याने शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळतील, असा अदांज आहे. पेरण्या लांबत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाचा लहरीपणा असाच राहिला, तर उत्पादन खर्चही निघते की नाही, याची शाश्वती नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पाऊस लांबल्याने पेरण्या ठप्प आहेत. त्याप्रमाणेच तालुक्यात पाणी व चारा टंचाईच्या तीव्रतेने डोके वर काढले आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागलेली पायपीट अजूनही सुरूच आहे. नदी-नाले तसेच विहिरी तलाव कोरडे पडले आहेत, तर कुठे पाणी साठा असूनही नियोजनशून्य कार्य पद्धतीमुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे. जनावरांचा चारा संपण्याच्या मार्गावर आहे. पावसाच्या आगमनावर छत्री, रेनकोट विक्रेते याचा व्यवसाय अवलंबून असतो. पाऊस लांबल्याने व्यापार मंदावला आहे. पाऊस नसल्याने पुढील सर्व प्रक्रिया मंदावल्या आहेत. नागरिक हात आखडून पैसा खर्च करीत आहेत. पेरणीला सुरुवात झाली असती, तर शेतमजुरांना रोजगार मिळाला असता.