शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नदी-नाले कोरडे; कृत्रिम पाणीटंचाईची झळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:20 IST

विजय शिंदे अकोट : तालुक्यात शेती व पिण्यासाठी सद्यस्थितीत मुबलक पाणी पुरवठा असला, तरी नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे ...

विजय शिंदे

अकोट : तालुक्यात शेती व पिण्यासाठी सद्यस्थितीत मुबलक पाणी पुरवठा असला, तरी नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्यासाठी वान धरणातून शहरवासीयांची तहान भागविली जात आहे. मात्र, नदी-नाले कोरडे पडले असून, जनावरांचे हाल होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

तालुक्याचे भूगर्भ क्षेत्र खारेपाणी व गोडे पाणी पट्ट्यात विभागले गेले आहे. खारपाणपट्ट्यासह तालुका व शहराला वान धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. तालुक्यातील ८४ खेडी योजनेंतर्गत पाणी पुरवठा सुरू आहे. अनेक गावातील जलकुंभ पांढरे हत्ती ठरले आहेत. त्यामुळे वानचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून गावा-गावातील जलकुंभ न चढविता थेट नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. तालुक्यातील गोड पाणी पट्ट्यात वान धरणासह कूपनलिकातून उपसा करून घशाची तहान भागविण्यात येते. परंतु, खारपाणपट्ट्यात असलेल्या नागरिकांना वान धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. विशेष म्हणजे पाणी खारे असल्याने जनावरांचे आरोग्य लक्षात घेता जनावरांची तहानही गोडे पाण्याने भागविण्यासाठी वानधरणातील पाणी वापरतात. (फोटो)

जलवाहिनी लिकेज होण्याचे प्रमाण वाढले!

शहरात मुबलक पिण्याचे पाणी आहे. परंतु वान धरणातून पुरवठा करणारी जलवाहिनी वारंवार लिकेज होत असल्याने पाण्याची मोठी नासाडी होते. अनेक ठिकाणी व्हॉल्व्हला गळती लागत आहेत. त्यामुळे मुबलक पाणी असूनही कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. खारपाणपट्ट्यात काही गावांमध्ये पाणी पोहोचत नाही. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. गुरांच्या पाण्यासाठी तयार धर्माळ कोरडी पडल्यामुळे जनावराची भटकंती होत आहे.

मान्सून पूर्व कपाशी लागवड

तालुक्यात पोपटखेड प्रकल्प, शहापूर (रुपागढ) प्रकल्प, पणज शहापूर प्रकल्प, खिरकुड तलाव धरण शेतीसाठी पाणी आरक्षित आहे. त्यामुळे सातपुडा पायथ्याशी मे महिन्यातच मान्सूनपूर्व कपाशी लागवड करण्यात आली आहे.

पारा चढला, उपाययोजनांची कामे संथ गतीने!

जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई उपाययोजनांच्या आराखड्यात तालुक्यात ५४ गावांसाठी ९७ उपाययोजना प्रस्तावित आहेत. त्यामध्ये ४२ गावात कूपनलिका, १५ गावात विंधन विहिरी, २३ गावात विशेष नळ योजना दुरुस्ती, १५ विहिरी अधिग्रहण तर २ विहिरीतील गाळ काढण्याची कामे जानेवारी ते जून पर्यंतच्या कालावधीत करण्यासाठी नमूद केली आहेत. मात्र, अद्याप तरीही उन्हाळ्यात पारा चढला, तरी उपाययोजनांच्या कामाला गती मिळाली नसल्याची स्थिती आहे.

या यंत्रणेद्वारे होतो पाणीपुरवठा

अकोट तालुक्यातील १४२ गावे आहेत. तर ७९ ग्रामपंचायती आहेत. वान धरणातून ८४ खेडी योजनाअंतर्गत पाणीपुरवठा होत असला तरी ४३ गावात ६३ स्वतंत्र नळयोजना आहेत. तसेच २० गावात ३१ लघु नळ योजना आहेत. ११ गावात १० महाजल योजना आहेत. जलस्वराज्य योजना ७ गावात कार्यान्वित असून हातपंप आहेत, अशी पाणीपुरवठा करणारी यंत्रणा आहे.