शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

रब्बी हंगामही धोक्यात

By admin | Updated: October 25, 2014 01:18 IST

ओलावा नसल्याने अकोला जिल्ह्यात पेरण्या रखडल्यात.

संतोष येलकर / अकोलाअल्प पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीन ही पिके हातची गेली असतानाही रब्बी हंगामातील पेरण्यांची तयारी शेतकर्‍यांनी केली खरी; मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने, जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे खरीप पिकांसोबतच आता रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.यावर्षी पावसाळ्यात तब्बल सव्वा महिना उशिराने पावसाने हजेरी लावली, पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरण्या उशिराने सुरू करण्यात आल्या होत्या. आधीच उशिरा आलेला पाऊस आणि त्यानंतर कमी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक आले नाही. तसेच सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. एकरी ५0 किलो ते एक क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांची दिवाळी टंचाईतच जात आहे. ज्या भागात जमिनीत तीन ते चार इंचापर्यंत ओलावा आहे, अशा भागात रब्बी पेरण्या सुरू करण्यात आल्या; परंतु जिल्ह्यातील बहुतांश भागात जमिनीतील ओलावा खोल गेल्याने, दिवाळी उलटून जात असली तरी, रब्बीच्या पेरण्या रखडल्या आहेत. यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २00 हेक्टर क्षेत्रावर हरभरा, गहू, करडई व सूर्यफूल इत्यादी रब्बी पिकांच्या मुख्याने हरभरा पेरणीचा समावेश आहे. पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे; मात्र नियोजनाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ पाच ते सात टक्के पेरण्या झाल्या असून, त्यामध्ये प्राजिल्ह्यात ज्या भागात जमिनीत ओलावा आहे, त्या भागात रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या; मात्र जमिनीतील ओल खोल गेलेल्या भागात पेरण्या सुरू होणे बाकी आहे. जमिनीत ओलावा कमी असल्याने जिल्ह्यात सार्वत्रिक रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या नाही. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा केली जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी सांगीतले.