शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अन्न सुरक्षा योजनेने पळविला हक्काचा घास

By admin | Updated: May 16, 2014 21:36 IST

अन्न सुरक्षा योजनेने गरिबांना मिळणारा हक्काचा घास हिरावल्या गेल्यामुळे ग्रामीण भागात या योजनेबाबत नाराजी दिसत आहे.

आगर(अकोला): मोठा गाजावाजा करून अंमलात आलेल्या अन्न सुरक्षा योजनेने गरिबांना मिळणारा हक्काचा घास हिरावल्या गेल्यामुळे ग्रामीण भागात या योजनेबाबत नाराजी दिसत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत व दारिद्र्यात जीवन जगणार्‍या कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रास्त भाव धान्य दुकानांमधून दरमहा धान्य मिळत होते. यामध्ये प्रतिकार्ड धान्य व रॉकेल वितरित करण्यात येत होते. यामध्ये बी.पी. एल., अंत्योदय कुटुंबांना प्रतिकार्डप्रमाणे धान्य मिळत होते; परंतु यावर्षी मोठा गाजावाजा करून अंमलात आलेल्या अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य वाटपाचे निकष बदलले आहेत. आता या योजनेत प्रतिव्यक्ती या प्रमाणे धान्य मिळत असल्याने ज्यांचे कुटुंब मर्यादित आहे, अशा कुटुंबांच्या तोंडचा हक्काचा घास पळविला जात असल्याचे बोलले जात आहे. या योजनेचा खरा लाभ मोठ्या कुटुंबांनाच होत असल्याने सदर योजना कुटुंब वाढीस पर्यायाने लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देणारी असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सदर योजनेच्या निकषांत सुधारणा करून मर्यादित सदस्य असलेल्या कुटुंबावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.