शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षा योजनेने पळविला हक्काचा घास

By admin | Updated: May 16, 2014 21:36 IST

अन्न सुरक्षा योजनेने गरिबांना मिळणारा हक्काचा घास हिरावल्या गेल्यामुळे ग्रामीण भागात या योजनेबाबत नाराजी दिसत आहे.

आगर(अकोला): मोठा गाजावाजा करून अंमलात आलेल्या अन्न सुरक्षा योजनेने गरिबांना मिळणारा हक्काचा घास हिरावल्या गेल्यामुळे ग्रामीण भागात या योजनेबाबत नाराजी दिसत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत व दारिद्र्यात जीवन जगणार्‍या कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रास्त भाव धान्य दुकानांमधून दरमहा धान्य मिळत होते. यामध्ये प्रतिकार्ड धान्य व रॉकेल वितरित करण्यात येत होते. यामध्ये बी.पी. एल., अंत्योदय कुटुंबांना प्रतिकार्डप्रमाणे धान्य मिळत होते; परंतु यावर्षी मोठा गाजावाजा करून अंमलात आलेल्या अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य वाटपाचे निकष बदलले आहेत. आता या योजनेत प्रतिव्यक्ती या प्रमाणे धान्य मिळत असल्याने ज्यांचे कुटुंब मर्यादित आहे, अशा कुटुंबांच्या तोंडचा हक्काचा घास पळविला जात असल्याचे बोलले जात आहे. या योजनेचा खरा लाभ मोठ्या कुटुंबांनाच होत असल्याने सदर योजना कुटुंब वाढीस पर्यायाने लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देणारी असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सदर योजनेच्या निकषांत सुधारणा करून मर्यादित सदस्य असलेल्या कुटुंबावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.