शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नवरात्र संपताच भारनियमन सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 20:18 IST

अकोला : कोळशाच्या तुटवड्यामुळे काही केंद्रांमधील विद्युत निर्मिती ठप्प झाल्याने राज्यभरात आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. नवरात्रोत्सव व दसरा उत्सव संपताच जिल्हय़ात भारनियमनाने पुन्हा उचल खाल्ली असून, शहर व ग्रामीण भागांमध्ये ८ ते ९ तास वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे या ‘इर्मजन्सी लोडशेडिंग’ने नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

ठळक मुद्दे‘इर्मजन्सी लोडशेडिंग’ने नागरिक त्रस्त ८ ते ९ तास बत्ती गुल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोळशाच्या तुटवड्यामुळे काही केंद्रांमधील विद्युत निर्मिती ठप्प झाल्याने राज्यभरात आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. नवरात्रोत्सव व दसरा उत्सव संपताच जिल्हय़ात भारनियमनाने पुन्हा उचल खाल्ली असून, शहर व ग्रामीण भागांमध्ये ८ ते ९ तास वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे या ‘इर्मजन्सी लोडशेडिंग’ने नागरिक पुरते हैराण झाले आहेत.विजेची वाढती मागणी व उपलब्धतेचा मेळ बसविताना महावितरणला चांगलीच कसरत करावी लागत आहे. परिणामी, महावितरणकडून राज्यभरात आपत्कालीन भारनियमन सुरू करण्यात आले आहे. वीज देयकांची वसुली व वीज गळतीच्या प्रमाणाचा अभ्यास करून जिल्हय़ाची ग्रुपनिहाय विभागणी केली आहे. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यास ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘ई’, ‘एफ’, ‘जी १’, ‘जी २’ व ‘जी ३’ या ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केले जाते. गत काही दिवसांपासून विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरणच्यावतीने जिल्हय़ातील सर्वच ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केल्या जात आहे. मध्यंतरी वीज उपलब्धतेची स्थिती सुधारल्यामुळे तसेच नवरात्रोत्सव असल्यामुळे भारनियमनातून मुक्ती मिळाली होती; परंतु नवरात्रोत्सव संपताच भारनियमन पुन्हा सुरू झाले आहे. काही ग्रुपमध्ये सकाळी व सायंकाळी अशा दोन टप्प्यात, तर काही ग्रुपमध्ये सकाळ, दुपार व रात्री अशा तीन टप्प्यांमध्ये सव्वातीन ते सव्वानऊ तासांपर्यंत भारनियमन केले जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

उकाडा करतोय त्रस्तगत काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा वाढला आहे. ‘ऑक्टोबर हिट’ सुरू झाल्यामुळे घामधारांनी नागरिक आधीच त्रस्त असताना विजेच्या भारनियमनाने त्यात भरच पडली आहे. पाणीटंचाईच्या काळात वीज पुरवठय़ाअभावी पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत वाढच झाली आहे.