शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

नवरात्र संपताच भारनियमन सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 20:18 IST

अकोला : कोळशाच्या तुटवड्यामुळे काही केंद्रांमधील विद्युत निर्मिती ठप्प झाल्याने राज्यभरात आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. नवरात्रोत्सव व दसरा उत्सव संपताच जिल्हय़ात भारनियमनाने पुन्हा उचल खाल्ली असून, शहर व ग्रामीण भागांमध्ये ८ ते ९ तास वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे या ‘इर्मजन्सी लोडशेडिंग’ने नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

ठळक मुद्दे‘इर्मजन्सी लोडशेडिंग’ने नागरिक त्रस्त ८ ते ९ तास बत्ती गुल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोळशाच्या तुटवड्यामुळे काही केंद्रांमधील विद्युत निर्मिती ठप्प झाल्याने राज्यभरात आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. नवरात्रोत्सव व दसरा उत्सव संपताच जिल्हय़ात भारनियमनाने पुन्हा उचल खाल्ली असून, शहर व ग्रामीण भागांमध्ये ८ ते ९ तास वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे या ‘इर्मजन्सी लोडशेडिंग’ने नागरिक पुरते हैराण झाले आहेत.विजेची वाढती मागणी व उपलब्धतेचा मेळ बसविताना महावितरणला चांगलीच कसरत करावी लागत आहे. परिणामी, महावितरणकडून राज्यभरात आपत्कालीन भारनियमन सुरू करण्यात आले आहे. वीज देयकांची वसुली व वीज गळतीच्या प्रमाणाचा अभ्यास करून जिल्हय़ाची ग्रुपनिहाय विभागणी केली आहे. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यास ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘ई’, ‘एफ’, ‘जी १’, ‘जी २’ व ‘जी ३’ या ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केले जाते. गत काही दिवसांपासून विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरणच्यावतीने जिल्हय़ातील सर्वच ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केल्या जात आहे. मध्यंतरी वीज उपलब्धतेची स्थिती सुधारल्यामुळे तसेच नवरात्रोत्सव असल्यामुळे भारनियमनातून मुक्ती मिळाली होती; परंतु नवरात्रोत्सव संपताच भारनियमन पुन्हा सुरू झाले आहे. काही ग्रुपमध्ये सकाळी व सायंकाळी अशा दोन टप्प्यात, तर काही ग्रुपमध्ये सकाळ, दुपार व रात्री अशा तीन टप्प्यांमध्ये सव्वातीन ते सव्वानऊ तासांपर्यंत भारनियमन केले जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 

उकाडा करतोय त्रस्तगत काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा वाढला आहे. ‘ऑक्टोबर हिट’ सुरू झाल्यामुळे घामधारांनी नागरिक आधीच त्रस्त असताना विजेच्या भारनियमनाने त्यात भरच पडली आहे. पाणीटंचाईच्या काळात वीज पुरवठय़ाअभावी पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत वाढच झाली आहे.