शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

सुधारित: मनपातील गैरकारभाचे उत्खनन करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:18 IST

महापालिकेच्या अनागोंदी कारभारासंदर्भात राज्य शासनाकडे शिवसेनेचे विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी तीन वर्षांपूर्वी तक्रारी केल्या हाेत्या. केंद्र शासनाच्या ...

महापालिकेच्या अनागोंदी कारभारासंदर्भात राज्य शासनाकडे शिवसेनेचे विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी तीन वर्षांपूर्वी तक्रारी केल्या हाेत्या. केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियानमधील भूमिगत गटार याेजनेचे काम नियमबाह्यरीत्या सुरू असल्याचे तक्रारीत नमुद हाेते. त्यावेळी तत्कालीन पर्यावरण मंत्री ना. रामदास कदम यांनी सदर याेजनेच्या कामाला स्थगिती दिली हाेती. हा स्थगनादेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उठविला हाेता. यासाेबतच शहरातील निकृष्ट सिमेंट रस्ते, फोर- जी प्रकरण, शासनाकडून प्राप्त अनुदानाचा गैरवापर, पंतप्रधान आवास योजनेचेे सदाेष ‘डीपीआर’ तसेच १२ व्या व १३ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अनियमितता यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी आ. बाजाेरियांनी शासनाकडे लावून धरली हाेती. यासंदर्भात विधान परिषदेच्या उप-सभापती तथा समिती प्रमुख निलम गोऱ्हे यांनी गैरकारभाराची सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय विशेष उप-समिती गठीत केली आहे. उप-समितीने महापालिकेस भेट देऊन भूमिगत गटार याेजना, पाणीपुरवठा याेजना आदी प्रकल्पांची पाहणी करणे यासह संबंधित अधिकाऱ्यांची साक्ष नाेंदविण्याचा समावेश आहे.

अधिकारी अडकणार;पदाधिकारी माेकाट

शासनाच्या उप-समितीकडून केल्या जाणाऱ्या चाैकशीत कागदाेपत्री बांधलेले शाैचालये, भूमिगत गटार याेजना, पाणी पुरवठा याेजनेतील अनियमितता तसेच अवघ्या तीन महिन्यांत पितळ उघडे पडलेल्या निकृष्ट सिमेंट रस्तेप्रकरणी मनपाच्या जलप्रदाय विभाग तसेच बांधकाम विभागातील काही अधिकारी कचाट्यात सापडणार आहेत. काही प्रभावी पदाधिकारी व कंत्राटदारांच्या इशाऱ्यानुसार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना काेण वाचवणार,असा सवाल उपस्थित हाेत आहे.

भाजपच्या चिंतेत वाढ

शिवसेनेचे विधान परिषद सदस्य गाेपीकिशन बाजाेरिया यांच्या तक्रारीनुसार राज्य शासनाने मनपात मागील तीन वर्षांच्या कालावधीत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेचे ठराव,इतिवृत्ताची चाैकशी करण्याचा आदेश २४ डिसेंबर २०२० राेजी जारी केला हाेता. त्यासाठी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी चार सदस्यीय समितीचे गठन केले आहे. आता विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार ८ एप्रिल २०२१ राेजी तीन सदस्यीय समितीचे गठन करण्यात आल्याने भाजपच्या चिंतेत वाढ हाेण्याचे संकेत आहेत.