शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही करता येणार थकबाकी वसुली!

By admin | Updated: July 15, 2017 01:23 IST

महावितरणची मोहीम : दोन टक्के विशेष भत्ता मिळणार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : थकबाकीच्या वाढत्या डोंगरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने आता थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम आखली असून, या मोहिमेत महावितरणच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही सहभागी होता येणार आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडून थकबाकीची वसुली करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अधिकृत करायचे आणि यापोटी त्यांना विशेष भत्ता म्हणून वसुलीच्या एक ते दोन टक्के रक्कम द्यायचा, असा हा निर्णय महावितरणने घेतला आहे.राज्यात मुंबई वगळता सर्वत्र महावितरणद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो. विजेचा वापर करणारे ग्राहक वीज देयक भरत असले, तरी काही ग्राहक वीज देयक भरत नाहीत. त्यामुळे महावितरणची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच आहे. आजमितीस महावितरणची राज्यात २३ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये १७ हजार कोटी रुपये कृषिपंपांची थकबाकी आहे. एवढी मोठी रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणकडून वसुली मोहीम राबविली जाते. महावितरणच्या वित्त विभागाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार, कृषिपंपांची थकबाकी वगळता उर्वरित सहा हजार कोटींची थकबाकी वसूल करण्याच्या कामात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने सहभागी होता येणार आहे. सहभागी कर्मचाऱ्याने थकबाकी वसुली करताना ज्याचा वीज पुरवठा दोन वर्षांपूर्वी थकबाकीमुळे कापण्यात आला आहे, अशा ग्राहकांकडून वसुली केल्यास त्याला दोन टक्के रक्कम विशेष भत्ता म्हणून दिली जाणार आहे, तर थकबाकी न भरल्यामुळे ज्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित होऊन एक वर्षाहून अधिक व दोन वर्षांहून कमी कालावधी झाला आहे, अशांकडून वसुली केल्यास रकमेच्या एक टक्का विशेष भत्ता मिळणार आहे.स्वेच्छापत्र देणे अनिवार्यथकबाकी वसुलीकरिता आखण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या महावितरणच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यासाठी एक स्वेच्छापत्र विभागीय व मंडळ कार्यालयात द्यावे लागणाार आहे. याद्वारे ते उच्चदाब व लघुदाब वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करू शकणार आहेत. सहभागी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या वसुलीची माहिती संबंधित कार्यालयास सादर करावी लागणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांकडून सर्व माहिती मिळाल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून त्याची पडताळणी केली जाईल व त्यानंतर त्या कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात विशेष भत्ता वळता करण्यात येणार आहे.