शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर परिणाम

By admin | Updated: August 22, 2014 00:27 IST

पावसाने फिरवली पाठ, पाण्याचे स्रोतही आटले

अकोला - पावसाने पाठ फिरवली असून, पाण्याचा मुख्य स्रोतही बंद झाल्याने सध्या विहिरींच्या पाण्यावर संशोधनासाठी घेतलेली पिकं जगविण्याचा प्रयत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून केला जात आहे. पाणीच नसल्याने संशोधनासाठी घेतलेली पिकं जगविण्यासाठी उन्हाळ्य़ात पाणी आणावे तरी कोठून, असा प्रश्न कृषी विद्यापीठासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढच्या खरीप हंगामात विदर्भातील शेतकर्‍यांना सरळ व देशी वाण मिळेल की नाही, हाही प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विद्यापीठाकडे संशोधनासाठी जवळपास पाच हजार एकरपेक्षा जास्त शेती आहे. यात सर्वाधिक शेतजमीन वणीरंभापूर येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत आहे. या दोन्ही प्रक्षेत्रांवर विविध संशोधन केंद्र आहेत; पण पाणीच उपलब्ध नसल्याने या संशोधन केंद्रांच्या शास्त्रज्ञांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. कमी खर्चाचे तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा अर्थात बी-बियाण्यांवर संशोधन करू न ते शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या शास्त्रज्ञांवर आहे. त्याकरिता शास्त्रज्ञांच्या वेतनावर मोठा खर्च शासनाकडून केला जातो. भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्र व राज्य शासन या संशोधनाकरिता निधी उपलब्ध करू न देते; तथापि यावर्षी पावसाने पाठ फिरवली आणि पाण्याचे कायमस्वरू पी स्रोत उपलब्ध नसल्याने, येत्या उन्हाळ्य़ात शास्त्रज्ञांना हातावर हात धरू न बसावे लागण्याची शक्यता आहे. अकोल्याच्या कृषी विद्यापीठावर मागासलेल्या विदर्भाची मोठी जबाबदारी आहे. यापूर्वी याच कृषी विद्यापीठाने विविध वाण विकसित करू न शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. विदर्भात प्रामुख्याने कापूस व धान हे पीक घेतले जात असल्याने, शास्त्रज्ञांनी त्यादृष्टीने संशोधन केले. दिवसभर शास्त्रज्ञ प्रक्षेत्रावर कार्यरत असायचे. डॉ. तय्यब यांनी एचफोर ही कापसाची जात विकसित केली. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये या कापसाच्या जातीने क्रांती केली. डॉ. एल.के. मेश्राम यांनी रंगीत कापसाची जात विकसित केली. त्याकरिता त्यांनी जंगली कापसावर संशोधन केले. त्यावेळी पाण्याची सोय होती आणि ती काळाची गरजही होती. आज त्याहीपेक्षा मोठे आव्हान आहे; पण पाणीच नाही. कृषी विद्यापीठाला मोर्णा धरणातून पाणी मिळत होते. त्यामुळे विद्यापीठातील शरद सरोवरात मुबलक पाणी असायचे. हे सरोवर कृषी विद्यापीठाची मुख्य धमणी आहे. या तलावातून संशोधन प्रकल्पापर्यंत पाणी सोडले जायचे; पण गत काही वर्षांपासून कृषी विद्यापीठाला मोर्णा धरणातून पाणी मिळणे बंद झाले आहे. त्याचा परिणाम संशोधनावर होत आहे. यावर्षी अकोल्यातील मध्यवर्ती संशोधन प्रकल्पाच्या ११५0 हेक्टर प्रक्षेत्रापैकी केवळ २0 टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. त्याचा परिणाम बीजोत्पादन, बियाणे उत्पादनावर होत आहे. त्यामुळे संशोधनही प्रभावित होत आहे. यावेळी थोड्याफार क्षेत्रावर केलेली पेरणीही उन्हाळ्य़ात तग धरेल की नाही, हा प्रश्न उभा ठाकला आहे.