शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

जलसंधारणाच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध : प्रशासन लावणार सूचना फलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 14:35 IST

शेततळ्यांमध्ये बुडाल्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात येत असल्याचे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देपावसामुळे जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शेततळ्यात बुडाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी कोळंबी येथे घडली, यापूर्वीदेखील काही ठिकाणी अशा घटना घडल्या.शेततळ्यांसह जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी निर्माण झालेल्या धोक्यापासून जीव सांभाळण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

अकोला : जलयुक्त शिवार अभियान आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये शेततळ्यांची कामे करण्यात आली असून, पावसामुळे शेततळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठाही उपलब्ध झाला आहे; मात्र शेततळ्यांमध्ये बुडाल्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात येत असल्याचे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. त्यामुळे शेततळ्यांच्या धोक्यापासून जीव सांभाळण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात सन २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षात ३ हजार ९३२ जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये ७२२ शेततळ्यांसह ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध, सिमेंट नाला बांध खोलीकरण, नाला खोलीकरण, डोह खोदकाम, गाव तलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव, कोल्हापुरी बंधाºयांची दुरुस्ती इत्यादी कामांचा समावेश आहे, तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासकामांना जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गानजीक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ७२ जलसंधारणाच्या कामांना परवानगी देण्यात आली. त्यापैकी ६० जलसंधारणांची कामे पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये २८ शेततळ्यांसह नाला खोलीकरण, पाझर तलाव, गाव तलावांच्या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ९९२ जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसामुळे जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, शेततळ्यात बुडाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी कोळंबी येथे घडली, यापूर्वीदेखील काही ठिकाणी अशा घटना घडल्या. त्यामुळे शेततळ्यांसह जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी निर्माण झालेल्या धोक्यापासून जीव सांभाळण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जिल्ह्यात शेततळ्यांसह जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या आणि पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जलसंधारणाच्या कामातून पाणीसाठा निर्माण झालेल्या ठिकाणी जाण्यासाठी निर्बंध घालण्यात येत आहेत, असे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा