शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

जलसंधारणाच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध : प्रशासन लावणार सूचना फलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 14:35 IST

शेततळ्यांमध्ये बुडाल्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात येत असल्याचे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देपावसामुळे जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शेततळ्यात बुडाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी कोळंबी येथे घडली, यापूर्वीदेखील काही ठिकाणी अशा घटना घडल्या.शेततळ्यांसह जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी निर्माण झालेल्या धोक्यापासून जीव सांभाळण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

अकोला : जलयुक्त शिवार अभियान आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये शेततळ्यांची कामे करण्यात आली असून, पावसामुळे शेततळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठाही उपलब्ध झाला आहे; मात्र शेततळ्यांमध्ये बुडाल्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात येत असल्याचे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. त्यामुळे शेततळ्यांच्या धोक्यापासून जीव सांभाळण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात सन २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षात ३ हजार ९३२ जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये ७२२ शेततळ्यांसह ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध, सिमेंट नाला बांध खोलीकरण, नाला खोलीकरण, डोह खोदकाम, गाव तलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव, कोल्हापुरी बंधाºयांची दुरुस्ती इत्यादी कामांचा समावेश आहे, तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासकामांना जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गानजीक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ७२ जलसंधारणाच्या कामांना परवानगी देण्यात आली. त्यापैकी ६० जलसंधारणांची कामे पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये २८ शेततळ्यांसह नाला खोलीकरण, पाझर तलाव, गाव तलावांच्या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ९९२ जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसामुळे जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, शेततळ्यात बुडाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी कोळंबी येथे घडली, यापूर्वीदेखील काही ठिकाणी अशा घटना घडल्या. त्यामुळे शेततळ्यांसह जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी निर्माण झालेल्या धोक्यापासून जीव सांभाळण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जिल्ह्यात शेततळ्यांसह जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या आणि पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जलसंधारणाच्या कामातून पाणीसाठा निर्माण झालेल्या ठिकाणी जाण्यासाठी निर्बंध घालण्यात येत आहेत, असे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा