शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

संयम संपला; ग्रामीण भागात पेरणीची लगबग

By admin | Updated: July 13, 2014 00:53 IST

कपाशी व सोयाबीनचीही वेळ निघून जाणार असल्यामुळे शेतकर्‍यांनी अल्प पावसातच पेरणीला सुरुवात केली आहे.

अकोला: जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी जिल्हय़ात पेरणीयोग्य पाऊस पडला नाही; मात्र त्यानंतरही पेरणीला उशीर झाल्यामुळे पावसाच्या अपेक्षेने शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. पेरणीची वेळ निघून गेली असून, मूग व उडीद या पिकांची पेरणी केल्यावरही उत्पादन येणार नाही. आणखी काही दिवस पेरणी केली नाही तर कपाशी व सोयाबीनचीही वेळ निघून जाणार असल्यामुळे शेतकर्‍यांनी अल्प पावसातच पेरणीला सुरुवात केली आहे. गत काही वर्षांपासून जिल्हय़ात एकूण क्षेत्रावर सोयाबीनची ६0 टक्के पेरणी करण्यात येत होती. यावर्षी कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनची आतापर्यंत केवळ ३0७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापसाची १२६0४.४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही केवळ ७ टक्के असून, एकूण लक्ष्याच्या तुलनेत केवळ १0 टक्के पेरणी करण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे ओलिताची व्यवस्था आहे, त्यांनी जून महिन्यातच पेरणी केली होती. आकोट तालुक्यात कपाशीची १९३0 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तेल्हारा तालुक्यात ३४२८ हेक्टरवर, बाळापूरमध्ये २१५0, पातूर १२00, अकोला ३४३.४, बाश्रीटाकळी २७५९, मूर्तिजापूर ७९२ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे, तर सोयाबीनची तेल्हारा तालुक्यात २३८ हेक्टरवर, बाश्रीटाकळी ३३ तर मूर्तिजापूर तालुक्यात ३६.२ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. . १00 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.