शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

ठराव विखंडित; सत्तापक्षाने शासनाकडे मागितली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST

महापालिकेत सभांमध्ये चर्चा न करता विषयांना परस्पर मंजुरी दिली जात असल्याची तक्रार शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी शासनाकडे केली ...

महापालिकेत सभांमध्ये चर्चा न करता विषयांना परस्पर मंजुरी दिली जात असल्याची तक्रार शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी शासनाकडे केली हाेती. २ जुलैला पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक ६ ते १० व वेळेवरील विषयांत मंजूर केलेले ठराव क्रमांक ११ ते २२ च्या मुद्द्यांवर सत्तापक्षाने चर्चा न करता मंजुरी दिली तसेच २ सप्टेंबरला स्थायी समितीच्या सभेतही ठराव क्रमांक ५ ते ७ वर चर्चा न करता परस्पर मंजुरी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. सभेतील इतिवृत्ताची तपासणी करून चाैकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना दिले हाेते. विभागीय आयुक्तांच्या अहवालात सभागृहातील कामकाजावर आक्षेप नाेंदविण्यात आला. अहवाल लक्षात घेता शासनाने २ जुलैची सर्वसाधारण सभा व २ सप्टेंबरच्या स्थायी समितीमधील एकूण २० ठराव विखंडित करण्याचा आदेश दिला तसेच याविषयी स्पष्टीकरण सादर करण्यासाठी आयुक्त, महापाैर व स्थायी समिती सभापती यांना एक महिन्यांची मुदत दिली.

शासनाकडे कागदपत्रांची मागणी

सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभागृहातील कामकाजाचे इतिवृत्त, चलचित्र आदी सर्व बाबी प्रशासन व सत्तापक्षाकडे उपलब्ध आहेत तसेच सेना व काँग्रेसने नाेंदविलेल्या आक्षेपांच्या प्रतही उपलब्ध आहेत, असे असताना विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अहवालात काय नमूद केले, हे तपासून त्यानंतर खुलासा सादर करण्याचा सत्तापक्षाचा प्रयत्न दिसून येत आहे.

शासनाने ठराव विखंडित केल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. स्पष्टीकरण सादर करण्यासाठीच शासनाकडे कागदपत्रांची मागणी केली आहे.

-अर्चना मसने, महापाैर

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांच्या अहवालानंतर शासनाने सभांमधील कामकाज नियमबाह्य असण्यावर शिक्कामाेर्तब केले. शासनाकडे कागदपत्रांची मागणी केवळ कायदेशीर पेच निर्माण करण्यासाठी भाजपचा खटाटाेप दिसून येताे.

-राजेश मिश्रा, गटनेता शिवसेना,मनपा