शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

रिधोरा ग्रामस्थांनी एक दिवस अन्नत्याग करून वाहिली शहीदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:41 IST

अकोल्यापासून जवळच असलेल्या रिधोरा येथील ग्रामस्थांनी एक दिवसाचा अन्नत्याग करून शहिदांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.

रिधोरा (अकोला): पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या प्रति देशभर शोकसंवेदना व्यक्त होत आहेत. हल्ल्याचा संताप प्रत्येक नागरिकांच्या मनात आहे, तर दुसरीकडे शहिदांच्या बलिदानाचे अश्रू प्रत्येकाच्याच डोळ्यात आहेत. अकोल्यापासून जवळच असलेल्या रिधोरा येथील ग्रामस्थांनी एक दिवसाचा अन्नत्याग करून शहिदांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. बाळापूर तालुक्यातील रिधोरा हे गाव राष्टÑीय महामार्गावर आहे. या गावाच्या ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि गावातील युवकांनी शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी एक दिवसाच्या अन्नत्यागाचा संकल्प केला. त्याला ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन शहिदांच्या प्रति असलेल्या संवेदना अधोरेखित केल्या. शनिवारी सकाळपासूनच गावातील व्यावसायिक संकुलने बंद ठेवली होती. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळा ध्वज फडकविण्यात आला होता. सरपंचपती अनिल दंदी, पोलीस पाटील सुजय देशमुख, तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर देशमुख, मनोज अग्रवाल, धर्मेद्र दंदी, मंगेश गवई, कुंदन लोंढे, सय्यद इम्रान यांच्यासह नागरिकांनी अन्नत्यागाबाबत ग्रामस्थांनी माहिती देत त्यांचा सहभाग नोंदविला.येथील स्व. वसंतरावबापू देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलनात सहभागी होत शालेय पोषण आहाराची खिचडी नाकारून निषेध व्यक्त केला.हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मसूद अजहर याचा फोटो चपलांचा हार घालून गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आला होता. गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून फोटोला शेण लावून चप्पल व खेटराने मारण्यात आले.यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर प्रतीकात्मक फोटोचे दहन करण्यात आले. गावातील जातीभेद विसरून सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Akolaअकोलाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला