शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

सरपंचपदाचे राखीव अनुसूचित जमातीचे आरक्षण बदलू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:18 IST

जिल्ह्यामध्ये नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये १३ ग्रामपंचायतची सरपंच पदे आदिवासींसाठी आरक्षित करण्यात आली होती; परंतु ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित ...

जिल्ह्यामध्ये नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये १३ ग्रामपंचायतची सरपंच पदे आदिवासींसाठी आरक्षित करण्यात आली होती; परंतु ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जमातीचा सदस्य निवडून न आल्याने सरपंचपदे रिक्त असल्याचे कारण पुढे करून जिल्हा प्रशासनाने १३ पैकी ११ ठिकाणी आरक्षण बेकायदेशीरपणे रद्द केले व ओबीसीसाठी राखीव केले. ग्रामविकास विभागाने २७ जानेवारी रोजी परिपत्रकाद्वारे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सरपंचपदाच्या अनु. जाती-जमातीसाठी राखीव करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये कोणताही बदल करू नये, असे आदेशित केले आहे. या आदेशाला औरंगाबाद उच्च न्यायालयाचा संदर्भ दिला आहे. जिल्हा प्रशासनाची ही कृती आदिवासींवर अन्याय करणारी आहे. निवडणुकीपूर्वी घोषित करण्यात आलेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे, तसेच भविष्यात ज्या गावामध्ये सरपंचपदे आदिवासीसाठी राखीव ठेवण्यात येईल, त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यपदासाठीसुद्धा जागा राखीव करण्यासाठी नियमात बदल करावा अशी मागणी निवेदनात केली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंग सोळंके, तुळशीराम सोळंके, राजू सोळंके, रूपेश जाधव, अंबादास चव्हाण, सुरेश कलोरे, बाळू पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.