शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात करणाऱ्या औषधीचे संशोधन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:20 IST

आपणास राज्यातील जनतेच्या वतीने हात जोडून विनंती करण्यात येते की, कोरोनाचा विळखा सोडविण्यासाठी राज्यातील मोठे उद्याेगपती, औषधी ...

आपणास राज्यातील जनतेच्या वतीने हात जोडून विनंती करण्यात येते की, कोरोनाचा विळखा सोडविण्यासाठी राज्यातील मोठे उद्याेगपती, औषधी संशोधक, तज्ज्ञ डॉक्टर, तज्ज्ञ वैद्य यांचे माध्यमातून औषधीची निर्मिती करून घ्यावी. देशात एका वर्षापूवी आलेला कोरोना घालविण्यासाठी टाळेबंदी, सक्तीची कार्यवाही असे विविध प्रयत्न करण्यात आले. आजही हे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधक लस व काही औषधी आल्यानंतरही कोरोनावर नियंत्रण मिळविता आले नाही. दुर्गम भागातील गावांमध्ये मात्र कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. याचा शासनाने अभ्यास करावा असा सल्ला देऊन लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊन, वीकेंड लॉकडाऊन हे पर्याय नाहीत, असे सावजी यांनी म्हटले आहे.

वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, या शैक्षणिक अपहरणाला जबाबदार कोण, असा सवालही सावजी यांनी उपस्थित केला आहे.

आरोग्य सेवा व पोलीस वगळता इतर विभागातील शासकीय कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांचे एका वर्षाचे ६० टक्के वेतन सरकार जमा करून, तसेच दारू व चैनीच्या वस्तूंवर ३० टक्के कर वाढवून पैसा उभारावा, अशी सूचनाही सावजी यांनी केली आहे. राज्यात सुरू असलेली ३०० कोटी रुपयांची सर्व कामे थांबवून तो पैसा आरोग्य सेवेसाठी वापरावा, असेही सावजी यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनमुळे पडले दोन गट

लॉकडाऊनच्या शासकीय आदेशाने राज्यातील जनता दोन भागांत विभागल्या गेल्याचे सावजी यांनी म्हटले आहे. वेतनधारक, निवृत्ती वेतनधारक, औषधी व जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्यांचा एक गट. लॉकडाऊनमध्ये यांचे व्यवसाय सुरू असल्याने ते अडमाप नफा कमावत आहेत. रोजंदारी, माहेवारी काम करणारे कामगार, शेतकरी, शेतमजूर, कारखानदार, व्यापारी यांचा दुसरा गट. या दुसऱ्या गटाला गत वर्षभरापासून मोठा आर्थिक फटका बसला आहे. यांच्या नुकसान भरपाईची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी, असेही सावजी यांनी म्हटले आहे.