शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

संकटात सापडलेल्या शेतक-यांच्या भावना कळवा!

By admin | Updated: August 18, 2015 01:29 IST

पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना.

संतोष येलकर/अकोला: अत्यल्प पावसामुळे विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर गावागावात भेटी देऊन, संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या भावना कळवा, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना केल्या आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील २५ हजार ६४ गावांमधील पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी निघाली. याशिवाय नोव्हेंबर-डिसेंबर व फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानापोटी शेतकर्‍यांना मदत व सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, यावर्षीच्या पावसाळ्यातही राज्यातील बहुतांश भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक भागात पेरण्या उलटल्या असून, दुबार पेरणीपासूनही शेतकर्‍यांना फारशा आशा नाहीत. भरीस भर, काही जिल्हय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध नाही. राज्यात दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत काही निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती शेतकर्‍यांना देण्यासाठी, तसेच संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना धीर देण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात संबंधित पालकमंत्र्यांनी काही गावांना प्रत्यक्ष भेटी द्यावी आणि शेतकर्‍यांच्या भावना कळवाव्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना १0 ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे दिल्या. *प्रत्यक्ष गावभेटीतून पालकमंत्री देणार योजनांची माहिती! मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हय़ांचे पालकमंत्री संबंधित जिल्हय़ातील काही गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन, शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती देऊन संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना धीर देणार आहेत. २0१४-१५ मध्ये शेतकर्‍यांनी घेतलेल्या अल्पमुदती कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर करून, कर्जाचा हप्ता परत करणार्‍या शेतकर्‍यांच्या कर्जावरील व्याज २0१५-१६ या वर्षात माफ करण्यात येणार आहे. त्यापुढील चार वर्षांचे ६ टक्के दराने होणारे व्याज शासनामार्फत बँकांना देण्यात येणार आहे.