शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

संकटात सापडलेल्या शेतक-यांच्या भावना कळवा!

By admin | Updated: August 18, 2015 01:29 IST

पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना.

संतोष येलकर/अकोला: अत्यल्प पावसामुळे विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर गावागावात भेटी देऊन, संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या भावना कळवा, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना केल्या आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील २५ हजार ६४ गावांमधील पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी निघाली. याशिवाय नोव्हेंबर-डिसेंबर व फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानापोटी शेतकर्‍यांना मदत व सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, यावर्षीच्या पावसाळ्यातही राज्यातील बहुतांश भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक भागात पेरण्या उलटल्या असून, दुबार पेरणीपासूनही शेतकर्‍यांना फारशा आशा नाहीत. भरीस भर, काही जिल्हय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध नाही. राज्यात दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत काही निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती शेतकर्‍यांना देण्यासाठी, तसेच संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना धीर देण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात संबंधित पालकमंत्र्यांनी काही गावांना प्रत्यक्ष भेटी द्यावी आणि शेतकर्‍यांच्या भावना कळवाव्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना १0 ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे दिल्या. *प्रत्यक्ष गावभेटीतून पालकमंत्री देणार योजनांची माहिती! मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हय़ांचे पालकमंत्री संबंधित जिल्हय़ातील काही गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन, शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती देऊन संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना धीर देणार आहेत. २0१४-१५ मध्ये शेतकर्‍यांनी घेतलेल्या अल्पमुदती कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर करून, कर्जाचा हप्ता परत करणार्‍या शेतकर्‍यांच्या कर्जावरील व्याज २0१५-१६ या वर्षात माफ करण्यात येणार आहे. त्यापुढील चार वर्षांचे ६ टक्के दराने होणारे व्याज शासनामार्फत बँकांना देण्यात येणार आहे.