शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

केवळ सात हजारांवर शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन

By admin | Updated: June 6, 2016 02:39 IST

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ६८४ लाभार्थींंची निवड

संतोष येलकर/अकोलाखरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या; मात्र ४ जूनपर्यंंत जिल्हय़ात केवळ ७ हजार ३७५ (५.३२ टक्के) शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असून, ५५ हजार शेतकर्‍यांना ३७८ कोटी ७१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील १ लाख ३१ हजार २३२ शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन बँकांमार्फत केव्हा करण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी, पीक कर्जाचे पुनर्गठन करून, शेतकर्‍यांना पुन्हा नवीन पीक कर्ज वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत गत महिन्यात घेण्यात आला. त्यानुसार जिल्हय़ातील १ लाख ३८ हजार ६0७ शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे काम राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, खासगी बँका आणि ग्रामीण बँकेच्या शाखांमार्फत सुरू करण्यात आले; परंतु ४ जूनपर्यंंत जिल्हय़ात केवळ ७ हजार ३७५ शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. एकूण कर्जदार शेतकर्‍यांच्या तुलनेत केवळ ५.३२ टक्के शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तसेच जिल्हय़ात यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ३८ हजार ६0७ पेक्षा जास्त शेतकर्‍यांना ९७८ कोटी २१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी, ४ जूनपर्यंंत ५५ हजार २९ शेतकर्‍यांना ३७८ कोटी ७१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, जिल्हय़ातील पीक कर्जाचे पुनर्गठन आणि पीक कर्ज वाटपाचे अत्यल्प प्रमाण बघता, जिल्हय़ातील उर्वरित कर्जदार शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन आणि पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केव्हा पूर्ण होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.