शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

निधीअभावी रखडले ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन!

By admin | Updated: September 14, 2016 02:08 IST

शासनाकडून साडेतीन कोटींचा निधी अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे जिल्ह्यातील हजार कर्मचारी वेतनापासून वंचीत राहीले आहेत.

संतोष येलकर अकोला, दि. १३: शासनाकडून सहायक अनुदानापोटी ३ कोटी ४१ लाख ६९ हजार रुपयांचा निधी अद्याप उपलब्ध झाला नसल्याने गत पाच महिन्यांपासून जिल्हय़ातील ग्रामपंचायतींच्या ९९१ कर्मचार्‍यांचे वेतन अडकले आहे. त्यामुळे वेतनाचा निधी शासनाकडून केव्हा प्राप्त होणार, याबाबत जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत कर्मचार्‍यांना घर, पाणी, दिवाबत्ती आणि आरोग्य इत्यादी ग्रामपंचायत कर वसुली, ग्रामपंचायत व गावातील नाल्या सफाई, नमुना-८ तयार करणे, गावातील जन्म-मृत्यूच्या नोंदी घेणे व दाखले तयार करणे आणि ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या नोटीस ग्रामपंचायत सदस्यांना पोहोचविणे इत्यादी कामे करावी लागतात. या कामापोटी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दरमहा ५ हजार १00 रुपये वेतन दिले जाते. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनाचा ५0 टक्के खर्च ग्रामपंचायत आणि ५0 टक्के खर्च शासनामार्फत सहायक अनुदान निधीतून भागविला जातो. अकोला जिल्हय़ातील सातही तालुक्यांत ५४२ ग्रामपंचायत स्तरावर ९९१ कर्मचारी कार्यरत आहेत. सन २0१६-१७ या वर्षात जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी ३ कोटी ४१ लाख ६९ हजार ३00 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत गत ऑक्टोबर २0१५ मध्ये शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला; मात्र शासनामार्फत अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने, गत एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांचे जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे. शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने, गत पाच महिन्यांपासून जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वेतनाविना राहावे लागत आहे. त्यामुळे वेतनापोटी सहायक अनुदानाचा निधी शासनामार्फत केव्हा मिळणार आणि निधीत अडकलेले वेतन केव्हा मिळणार, याबाबत जिल्हय़ातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.