शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

महाराष्ट्रातून काँग्रेसरूपी घाण दूर करा - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: October 3, 2014 01:33 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे अकोल्यात प्रतिपादन.

अकोला : महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचे विक्रम केले आहेत. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम या सरकारने केले. आज गांधी जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा संकल्प केला आहे. आपणही आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसरूपी घाण दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अकोल्यात व्य क्त केले. अकोला जिल्ह्यातील भाजपा उमदेवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी मंचावर भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, खासदार संजय धोत्रे, उमेदवार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, तेजराव थोरात, हरीश पिंपळे, आमदार डॉ. रणजित पाटील, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, महापौर उज्ज्वला देशमुख, हरीश आलिमचंदानी, प्रा. उदय देशमुख, रिपाइंचे डी. गोपनारायण, सुनील अवचार, वंदना वासनिक आदी उपस्थित होते. पुढे बोल ताना फडणवीस यांनी, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विकासाचा रथ देशात दौडत आहे. ही विकासाची गंगा महाराष्ट्रात आणण्यासाठी भाजपाची सत्ता हवी असल्याचे सांगितले. यावेळी फडणवीस यांनी आघाडी शासनाने केलेले विविध घोटाळेदेखील मांडले. भाजपाचे शासन आल्यावर एल.बी.टी. हद्दपार करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.