शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

जलव्यवस्थापनाच्या ताळेबंदासाठी रिमोट सेन्सिंगचा वापर करण्याची गरज!

By admin | Updated: October 7, 2015 02:03 IST

व्हीएनएमकेव्ही करणार शिफारस; प्रबोधनावर भर.

अकोला: पाणलोट आधारित पावसाचे व जमिनीचे व्यवस्थापन काळाची गरज असून, पाणी संकलनासाठी छोटे नाले, नद्यांची अद्ययावत माहिती सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेण्याची आवश्यकता आहे. याकरिता स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ एक आराखडा तयार करू न शासनाला शिफारस करणार आहे. राज्यातील कृषी विद्यापीठात पाणलोट विकास क्षेत्र व इतर ठिकाणी भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन प्रकल्पावर काम सुरू आहे. पाच वर्ष चालणार्‍या या प्रकल्पांतर्गत कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. यामुळे नाल्याच्या भोवतालच्या विहिरींची व जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असल्याचे भूगर्भ पाणी मोजणी यंत्राद्वारे त्यांना पाहता आले. या प्रकल्पामुळे या भागातील पिकांना संरक्षित ओलिताची सोय झाली आहे. असेच प्रकल्प राज्यात प्रत्येक ठिकाणी राबविल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने व व्हीएनएमकेव्हीने एक आराखडा तयार करू न राज्य शासनाला द्यावा, असे प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाला रिमोट सेन्सिंगद्वारे राज्यातील प्रत्येक छोट्या-मोठय़ा नाल्यांची माहिती घेऊन व्यवस्थान करावे लागणार आहे. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन प्रकल्पाच्या मूल्यमापन समितीचे अध्यक्ष डॉ.बी. वेंकटसरलू यांनी यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते प्रत्येक कार्यशाळेत या संबंधी शास्त्रज्ञ इत्यादीचे प्रबोधन करीत आहेत. आयसीएआरने मूलस्थानी जलसंवर्धनासाठी कृषी विद्यापीठांना सहकार्य केले असून, राज्यातील कृषी विद्यापीठात जल व्यवस्थापनावर काम केले जात आहे. राज्य शासनाने राज्यातील छोट्या-मोठय़ा नाल्यांची रिमोट सेन्सिंगद्वारे माहिती घेऊन पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापनावर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह व्हीएनएमकेव्हीने एक आराखडा करू न राज्य शासनाला शिफारस करावी, अशी सूचना या विद्यापीठाला केली आहे.