शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जलव्यवस्थापनाच्या ताळेबंदासाठी रिमोट सेन्सिंगचा वापर करण्याची गरज!

By admin | Updated: October 7, 2015 02:03 IST

व्हीएनएमकेव्ही करणार शिफारस; प्रबोधनावर भर.

अकोला: पाणलोट आधारित पावसाचे व जमिनीचे व्यवस्थापन काळाची गरज असून, पाणी संकलनासाठी छोटे नाले, नद्यांची अद्ययावत माहिती सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेण्याची आवश्यकता आहे. याकरिता स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ एक आराखडा तयार करू न शासनाला शिफारस करणार आहे. राज्यातील कृषी विद्यापीठात पाणलोट विकास क्षेत्र व इतर ठिकाणी भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन प्रकल्पावर काम सुरू आहे. पाच वर्ष चालणार्‍या या प्रकल्पांतर्गत कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. यामुळे नाल्याच्या भोवतालच्या विहिरींची व जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असल्याचे भूगर्भ पाणी मोजणी यंत्राद्वारे त्यांना पाहता आले. या प्रकल्पामुळे या भागातील पिकांना संरक्षित ओलिताची सोय झाली आहे. असेच प्रकल्प राज्यात प्रत्येक ठिकाणी राबविल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने व व्हीएनएमकेव्हीने एक आराखडा तयार करू न राज्य शासनाला द्यावा, असे प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाला रिमोट सेन्सिंगद्वारे राज्यातील प्रत्येक छोट्या-मोठय़ा नाल्यांची माहिती घेऊन व्यवस्थान करावे लागणार आहे. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन प्रकल्पाच्या मूल्यमापन समितीचे अध्यक्ष डॉ.बी. वेंकटसरलू यांनी यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते प्रत्येक कार्यशाळेत या संबंधी शास्त्रज्ञ इत्यादीचे प्रबोधन करीत आहेत. आयसीएआरने मूलस्थानी जलसंवर्धनासाठी कृषी विद्यापीठांना सहकार्य केले असून, राज्यातील कृषी विद्यापीठात जल व्यवस्थापनावर काम केले जात आहे. राज्य शासनाने राज्यातील छोट्या-मोठय़ा नाल्यांची रिमोट सेन्सिंगद्वारे माहिती घेऊन पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापनावर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह व्हीएनएमकेव्हीने एक आराखडा करू न राज्य शासनाला शिफारस करावी, अशी सूचना या विद्यापीठाला केली आहे.