शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांवरील उपाय ग्रामगीतेत

By admin | Updated: December 28, 2014 01:00 IST

अकोला येथील राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सवाच्या महिला संमेलनात उमटला सूर.

अकोला : या विज्ञानयुगात एकीकडे प्रगती होत असताना स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांत वाढ होत आहे. स्त्रियांसंदर्भात जेवढी सुखांची निर्मिती होत आहे, तेवढीच समस्या व दु:खेही वाढत आहे. स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाय म्हणजे ग्रामगीता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सुधाताई जवंजाळ यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन स्थानिक स्वराज्य भवनात करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान महिला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विचारपीठावर शैलजा गावंडे होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून जयश्री सोनखासकर, भाग्यश्री देशमुख, डॉ. कल्याणी पदमने, डॉ. सामा तायडे, प्राजक्ता गवळी तसेच अतिथी म्हणून नगरसेविका मंगला म्हैसने, ज्योत्स्ना काकड, सीमा हरणे, निर्मला गावंडे, विद्या म्हैसने, साक्षी पवार, चराटे, चित्रलेखा म्हैसने, दीपाली पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुधाताई देशमुख म्हणाल्या, की ग्रामगीातेच्या २0 व्या अध्यायात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुमंत्र दिला आहे. या ग्रामगीतेत स्त्रियांच्या प्रश्नांची कशाप्रकारे उकल करून त्यांना आत्मनिर्भर करावे, याचा ऊहापोह करण्यात आला असून, स्त्रियांनी ग्रामगीतेचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. भाग्यश्री देशमुख यांनी स्त्रियांच्या समस्येचा आलेख मांडला. समाजाने स्त्रियांच्या समस्यांबाबत चिंतन करून त्यांना अग्रस्थान द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. कल्याणी पद्मने म्हणाल्या, की ध्यानधारणा व साधनेच्या माध्यमातून स्त्री आत्मिक सुखी होऊन आरोग्यमुक्त होते. स्त्रियांनी या धकाधकीच्या युगात आरोग्यावर लक्ष केंद्रित करून प्राणायामाचा अंगीकार करावा. साक्षी पवार यांनी युवतींसंदर्भात माहिती देत मुलींनी उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. मंगला म्हैसने यांनी स्त्रियांनी सामाजिक कार्यासोबतच शहर स्वच्छता व नागरी विकासासाठी प्रयत्न करायला हवे, असे सांगितले.