शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांवरील उपाय ग्रामगीतेत

By admin | Updated: December 28, 2014 01:00 IST

अकोला येथील राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सवाच्या महिला संमेलनात उमटला सूर.

अकोला : या विज्ञानयुगात एकीकडे प्रगती होत असताना स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांत वाढ होत आहे. स्त्रियांसंदर्भात जेवढी सुखांची निर्मिती होत आहे, तेवढीच समस्या व दु:खेही वाढत आहे. स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाय म्हणजे ग्रामगीता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सुधाताई जवंजाळ यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन स्थानिक स्वराज्य भवनात करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान महिला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विचारपीठावर शैलजा गावंडे होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून जयश्री सोनखासकर, भाग्यश्री देशमुख, डॉ. कल्याणी पदमने, डॉ. सामा तायडे, प्राजक्ता गवळी तसेच अतिथी म्हणून नगरसेविका मंगला म्हैसने, ज्योत्स्ना काकड, सीमा हरणे, निर्मला गावंडे, विद्या म्हैसने, साक्षी पवार, चराटे, चित्रलेखा म्हैसने, दीपाली पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुधाताई देशमुख म्हणाल्या, की ग्रामगीातेच्या २0 व्या अध्यायात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुमंत्र दिला आहे. या ग्रामगीतेत स्त्रियांच्या प्रश्नांची कशाप्रकारे उकल करून त्यांना आत्मनिर्भर करावे, याचा ऊहापोह करण्यात आला असून, स्त्रियांनी ग्रामगीतेचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. भाग्यश्री देशमुख यांनी स्त्रियांच्या समस्येचा आलेख मांडला. समाजाने स्त्रियांच्या समस्यांबाबत चिंतन करून त्यांना अग्रस्थान द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. कल्याणी पद्मने म्हणाल्या, की ध्यानधारणा व साधनेच्या माध्यमातून स्त्री आत्मिक सुखी होऊन आरोग्यमुक्त होते. स्त्रियांनी या धकाधकीच्या युगात आरोग्यावर लक्ष केंद्रित करून प्राणायामाचा अंगीकार करावा. साक्षी पवार यांनी युवतींसंदर्भात माहिती देत मुलींनी उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. मंगला म्हैसने यांनी स्त्रियांनी सामाजिक कार्यासोबतच शहर स्वच्छता व नागरी विकासासाठी प्रयत्न करायला हवे, असे सांगितले.