शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांवरील उपाय ग्रामगीतेत

By admin | Updated: December 28, 2014 01:00 IST

अकोला येथील राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सवाच्या महिला संमेलनात उमटला सूर.

अकोला : या विज्ञानयुगात एकीकडे प्रगती होत असताना स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांत वाढ होत आहे. स्त्रियांसंदर्भात जेवढी सुखांची निर्मिती होत आहे, तेवढीच समस्या व दु:खेही वाढत आहे. स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाय म्हणजे ग्रामगीता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सुधाताई जवंजाळ यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन स्थानिक स्वराज्य भवनात करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान महिला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विचारपीठावर शैलजा गावंडे होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून जयश्री सोनखासकर, भाग्यश्री देशमुख, डॉ. कल्याणी पदमने, डॉ. सामा तायडे, प्राजक्ता गवळी तसेच अतिथी म्हणून नगरसेविका मंगला म्हैसने, ज्योत्स्ना काकड, सीमा हरणे, निर्मला गावंडे, विद्या म्हैसने, साक्षी पवार, चराटे, चित्रलेखा म्हैसने, दीपाली पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुधाताई देशमुख म्हणाल्या, की ग्रामगीातेच्या २0 व्या अध्यायात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुमंत्र दिला आहे. या ग्रामगीतेत स्त्रियांच्या प्रश्नांची कशाप्रकारे उकल करून त्यांना आत्मनिर्भर करावे, याचा ऊहापोह करण्यात आला असून, स्त्रियांनी ग्रामगीतेचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. भाग्यश्री देशमुख यांनी स्त्रियांच्या समस्येचा आलेख मांडला. समाजाने स्त्रियांच्या समस्यांबाबत चिंतन करून त्यांना अग्रस्थान द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. कल्याणी पद्मने म्हणाल्या, की ध्यानधारणा व साधनेच्या माध्यमातून स्त्री आत्मिक सुखी होऊन आरोग्यमुक्त होते. स्त्रियांनी या धकाधकीच्या युगात आरोग्यावर लक्ष केंद्रित करून प्राणायामाचा अंगीकार करावा. साक्षी पवार यांनी युवतींसंदर्भात माहिती देत मुलींनी उज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. मंगला म्हैसने यांनी स्त्रियांनी सामाजिक कार्यासोबतच शहर स्वच्छता व नागरी विकासासाठी प्रयत्न करायला हवे, असे सांगितले.