शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

उतावळी धरणाचे पाणी मन नदीत सोडा!

By admin | Updated: December 29, 2014 00:57 IST

बंधारे पडले आहेत कोरडे : सिंचनासाठी शेतक-यांची मागणी.

तुलंगा बु. (पातूर, जि. अकोला) : यावर्षी पावसाळय़ात अल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असून, नदी-नाले कोरडे पडले आहेत. या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा येथील उतावळी धरणातील पाणी मन नदीत सोडण्याची मागणी पातूर तालुक्यातील तुलंगा बु. परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. पातूर तालुक्यातील तुलंगा बु. परिसरातील सांगोळा, लावखेड, निमखेड, चांगेफळ, शहापूर, तुलंगा, तांदळी आदी गावे मन नदीच्या काठावर वसलेली आहेत. या गावांतील लोकांना मन नदीचे पाणी हे वरदान ठरले आहे. तथापि, यावर्षी पावसाळय़ात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे ही नदी हिवाळय़ातच कोरडी पडली आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आता या शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील गहु, हरभरा, कांदा व इतर फळवर्गीय पिकांपासून आशा आहेत. या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. दरवर्षी मन नदीला पाणी असते; परंतु यावर्षी नदी आटल्यामुळे कोल्हापुरी बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे सिंचनाअभावी परिसरातील हिरवीगार पिके सुकू लागली आहेत. हिवाळय़ातच ही स्थिती आहे, तर उन्हाळय़ात काय हाल होतील, अशी साधार भीती लोकांना आहे. उन्हाळय़ात पाणीटंचाई भासू नये तसेच गुरा-ढोरांसाठी पाण्याची उपलब्धता राहावी, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी उतावळी धरणाचे पाणी मन नदीच्या पात्रात सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.