शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

उतावळी धरणाचे पाणी मन नदीत सोडा!

By admin | Updated: December 29, 2014 00:57 IST

बंधारे पडले आहेत कोरडे : सिंचनासाठी शेतक-यांची मागणी.

तुलंगा बु. (पातूर, जि. अकोला) : यावर्षी पावसाळय़ात अल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असून, नदी-नाले कोरडे पडले आहेत. या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा येथील उतावळी धरणातील पाणी मन नदीत सोडण्याची मागणी पातूर तालुक्यातील तुलंगा बु. परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. पातूर तालुक्यातील तुलंगा बु. परिसरातील सांगोळा, लावखेड, निमखेड, चांगेफळ, शहापूर, तुलंगा, तांदळी आदी गावे मन नदीच्या काठावर वसलेली आहेत. या गावांतील लोकांना मन नदीचे पाणी हे वरदान ठरले आहे. तथापि, यावर्षी पावसाळय़ात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे ही नदी हिवाळय़ातच कोरडी पडली आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आता या शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील गहु, हरभरा, कांदा व इतर फळवर्गीय पिकांपासून आशा आहेत. या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. दरवर्षी मन नदीला पाणी असते; परंतु यावर्षी नदी आटल्यामुळे कोल्हापुरी बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे सिंचनाअभावी परिसरातील हिरवीगार पिके सुकू लागली आहेत. हिवाळय़ातच ही स्थिती आहे, तर उन्हाळय़ात काय हाल होतील, अशी साधार भीती लोकांना आहे. उन्हाळय़ात पाणीटंचाई भासू नये तसेच गुरा-ढोरांसाठी पाण्याची उपलब्धता राहावी, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी उतावळी धरणाचे पाणी मन नदीच्या पात्रात सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.