शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

उतावळी धरणाचे पाणी मन नदीत सोडा!

By admin | Updated: December 29, 2014 00:57 IST

बंधारे पडले आहेत कोरडे : सिंचनासाठी शेतक-यांची मागणी.

तुलंगा बु. (पातूर, जि. अकोला) : यावर्षी पावसाळय़ात अल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असून, नदी-नाले कोरडे पडले आहेत. या पृष्ठभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा येथील उतावळी धरणातील पाणी मन नदीत सोडण्याची मागणी पातूर तालुक्यातील तुलंगा बु. परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. पातूर तालुक्यातील तुलंगा बु. परिसरातील सांगोळा, लावखेड, निमखेड, चांगेफळ, शहापूर, तुलंगा, तांदळी आदी गावे मन नदीच्या काठावर वसलेली आहेत. या गावांतील लोकांना मन नदीचे पाणी हे वरदान ठरले आहे. तथापि, यावर्षी पावसाळय़ात पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे ही नदी हिवाळय़ातच कोरडी पडली आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आता या शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील गहु, हरभरा, कांदा व इतर फळवर्गीय पिकांपासून आशा आहेत. या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. दरवर्षी मन नदीला पाणी असते; परंतु यावर्षी नदी आटल्यामुळे कोल्हापुरी बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे सिंचनाअभावी परिसरातील हिरवीगार पिके सुकू लागली आहेत. हिवाळय़ातच ही स्थिती आहे, तर उन्हाळय़ात काय हाल होतील, अशी साधार भीती लोकांना आहे. उन्हाळय़ात पाणीटंचाई भासू नये तसेच गुरा-ढोरांसाठी पाण्याची उपलब्धता राहावी, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी उतावळी धरणाचे पाणी मन नदीच्या पात्रात सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.