शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जलपुनर्भरण ‘मॉडेल’वर भर !

By admin | Updated: June 11, 2016 02:52 IST

व्हीएनएमकेव्हीचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटस्वरलू यांची ‘लोकमत’शी बातचीत.

अकोला: राज्यातील भूजल पातळी वाढावी, याकरिता शासकीय पातळीवर कामे सुरू आहेत; परंतु कृषी विद्यापीठांचीही जबाबदारी महत्त्वाची असल्याने आम्ही जलपुनर्भरण ह्यमॉडेलह्ण विकसित करण्यावर भर देत आहोत, अशी माहिती स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटश्‍वरलू यांनी खास ह्यलोकमतह्णशी बातचीत करताना दिली. 'जॉइंट अँग्रोस्को'साठी ते अकोला येथे आले असताना, त्यांनी भूजल पातळीवर चिंता व्यक्त केली.

प्रश्न : भूजल पातळी वाढविण्यासाठी काय करणार? उत्तर - कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रावर पाणलोट क्षेत्र आहे. या पाणलोट क्षेत्रावर कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ अभ्यास करतील. पावसाच्या पडणार्‍या पाण्याचा भूगर्भात किती संचय होतो, याचा सूक्ष्म अभ्यास करण्यात येईल. खडक, जमिनीचा पोत आदींवर संशोधन केले जाईल आणि पडणार्‍या पावसापैकी किती भूगर्भात संकलित होतो, हे तपासण्यात येईल. वेगवेगळ्य़ा ठिकाणी घेण्यात येणार्‍या संशोधन, प्रयोगांचा अंतिम निष्कर्ष काढून मॉडेल तयार करण्यात येईल आणि या मॉडेलचा राज्यभर विस्तार करण्यात येईल.प्रश्न : शेतीला लागणार्‍या पाण्याचे नियोजन कसे कराल?उत्तर - हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुळात कमी पाणी, खर्चात येणारे पीक संशोधनावर कृषी विद्यापीठांचा भर आहे. शेतकर्‍यांनीच शुद्ध बीजोत्पादन करावे, यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले असून, यावर्षी शेतकर्‍यांच्या शेतावर बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.प्रश्न : मराठवाड्यातील आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विद्यापीठाने काही प्रयत्न केले का?उत्तर - होय. मराठवाड्यातील शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कृषी विद्यापीठाने ह्यउमेदह्ण हा कार्यक्रम राबविला आहे आणि राबविणार आहोत. या कार्यक्रमांतर्गत शेतकर्‍यांना कमी खर्चाचे तंत्रज्ञान समजावून सांगितले. एवढेच नव्हे तर ते तंत्रज्ञान नाममात्र शुल्कात शेतकर्‍यांना उपलब्ध करणार आहोत. उसाचं पीक ठिबक सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही अंशी यात यश आले आहे.प्रश्न : कृषी विद्यापीठांच्या स्वतंत्र कृषी हवामान केंद्राचे काय झाले?उत्तर - कृषी विद्यापीठांना स्वतंत्र कृषी हवामान केंद्र मिळावे, यासाठीचे प्रयत्न कृषी विद्यापीठस्तरावर सुरू आहेत, पण राज्याचं एक कृषी हवामान केंद्र मराठवाड्यातील बदनापूरला देण्यात यावे, यासाठीची मागणी आम्ही महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत शासनाकडे केली आहे. त्यांची आज नितांत गरज आहे. पावसाच्या आगमनासह पीकपेरणीची माहिती शेतकर्‍यांना मिळावी, हा त्यामागील उद्देश आहे.