शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कार्यालयांमधील अंतर कमी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST

खरीप व रब्बी हंगामातील पिके तसेच फळवर्गीय पिकांसाठी कृषी कार्यालयामार्फत विविध याेजना राबविल्या जातात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसह प्रगतिशील शेतकऱ्यांपर्यंत याेजनांचा ...

खरीप व रब्बी हंगामातील पिके तसेच फळवर्गीय पिकांसाठी कृषी कार्यालयामार्फत विविध याेजना राबविल्या जातात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसह प्रगतिशील शेतकऱ्यांपर्यंत याेजनांचा लाभ पाेहाेचविण्याच्या अनुषंगाने व कामात एकसूत्रीपणा यावा या उद्देशातून जिल्ह्याची भाैगाेलिक रचना, शेतकऱ्यांची संख्या, शेतीचे क्षेत्रफळ आदी बाबी लक्षात घेऊन उपविभागीय कार्यालयांचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये दाेन तालुक्यांसाठी किमान एक उपविभागीय कार्यालय कार्यान्वित असले तरी प्रशासकीय अनास्थेमुळे काही ठिकाणी चार-चार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी थातूरमातूर याेजना निकाली काढल्या जात असल्याची बाब समाेर आली आहे. डाेंगराळ, दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना ८० किलाेमीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेल्या कृषी कार्यालयात जाणे साेयीस्कर ठरत नसल्यामुळे नाइलाजाने शासनाच्या याेजनांचा लाभ घेता येत नसल्याची तक्रार अकाेला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी कृषिमंत्री दादाराव भुसे यांच्याकडे केली. यासंदर्भात कृषिमंत्री भुसे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत चर्चा केली असता राज्यात अनेक ठिकाणी कृषी कार्यालयांमधील अंतर जास्त असल्याने शेतकऱ्यांची गैरसाेय हाेत असल्याची बाब निदर्शनास आली़

कृषिमंत्र्यांनी मागितला गाेषवारा!

जिल्हावार कृषी कार्यालयांची संख्या व त्या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या गावातील अंतर किती, याचा गाेषवारा सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी कृषी विभागाला दिले आहेत.