शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पाण्याचा पुनर्वापर; बचतीची आवश्यकता

By admin | Updated: July 14, 2014 01:04 IST

लोकमत इनिशिएटिव्ह थेंब महत्त्वाचा उज्ज्वल भविष्यासाठी

अकोला : कायम पाण्याच्या दृष्काळासाठी ओळख असलेल्या अकोलेकरांना पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. पाऊस येण्यास होत असलेल्या विलंबामुळे धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय आता सोडण्याची गरज आहे. पाणीबचतीसाठी अकोलेकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढे येण्याची हीच वेळ आहे.

अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी पाण्याच्या पुनर्वापरास सुरुवात केली आहे. तालुक्यातील आदिवासी बहुल भागात १0 हजार हेक्टरवर जलपुर्नभरणाचे काम केल जाते. राज्यातील काही प्रमुख शहरात महापालिका हद्दीत रेनवॉटरहार्वेस्टिंग करण्यात आले असून पालिकांनी अशा सोसायटी व नागरिकांना पाणीपट्टीत सुट दिली आहे. अकोला शहरातही हा प्रयोग नागरिकांनी राबवावा यासाठी महापालिकेसोबतच नागरिकांनी स्वयंस्पूर्तीने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरवर्षी उन्हाळा सुरु झाला की पाणी बचतीबाबत चर्चा होते. विविध उपाय सुचविले जातात. मात्र, पाऊस सुरू झाला, की सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे. लोकसंख्या वाढत आहे. पाणीसाठवण क्षमता मात्र वाढणार नाही. उपलब्ध पाणीच आपल्याला पुरवून वापरावे लागणार आहे, त्यामुळे आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. महापालिकेकडून उपाययोजना होतील म्हणून गप्प बसून चालणार नाही. वैयक्तिक पातळीवरही आपण पाणीबचतीसाठी काळजी घ्यायला हवी.

** अकोलेकरांनो लक्षात ठेवा.. खरे तर आपण पाण्याशी नीट वागत नाही. अर्मयाद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या बेबंद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे. त्यात पावसाने ओढ दिल्याने अकोलेकरांवर आता पाणी बचत करण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे. अकोलेकरांना आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो.

- आंघोळ बादलीत पाणी घेऊन केल्यास : १८ लिटर शॉवरखाली : १00 लिटर

- दाढी नळ सोडून दाढी केल्यास : १0 लिटरमग घेऊन : १ लिटर

- ब्रश नळ सोडून केल्यास : १0 लिटरमग घेऊन : १ लिटर

- कपडे नळाखाली : ११६ लि.बादलीचा वापर केल्यास : ३६ लिटर

- मोटार पाईप वापरल्यास : १00 लि.बादलीचा वापर केल्यास : १८ लिटर

- हात धुण्यासाठी नळाखाली : १0 लिटर मग घेऊन : अर्धा लिटर

- शौचविधी फ्लश केल्यास : २0 लिटर बादलीचा वापर केल्यास : ६ लिटर

** सामूहिक जबाबदारी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळकोंडाळ्यांची तातडीने दुरुस्ती करा येत्या पावसाळ्य़ात छतावर पडणार्‍या पाण्याचे संकलन करून त्याचे पुनर्भरण करण्यासाठी पुढाकार घ्या जुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. नैसर्गिक जलस्रोत व नदी काठावरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून अकोल्याची पुन्हा ह्यग्रीन सिटीह्ण ही ओळख निर्माण करावी. वैयक्तिक जबाबदारी नागरिकांनी कपडे व भांडी धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा. आंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढचे पाणी घ्यावे. नळाच्या पाण्याने गाडी धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने गाडी पुसावी. उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग करावा. नैसर्गिक साधनसंपत्तीचे आपण विश्‍वस्त असल्याचे भान ठेवून काही व्यक्ती, संस्था, गृहनिर्माण सोसायटी यांनी यापूर्वीपासूनच पाणी बचतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये छतावरील पाण्याचे संकलन, पुनर्भरण व पुनर्वापरासाठीचे प्रयोग यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या कामातून अनेकांना प्रेरणा मिळेल.

'लोकमत' च्या माध्यमातून त्यांचे कार्य समाजासमोर आणून त्याला बळ देण्याचा आमचा मानस आहे. आपल्या उपक्रमाची/प्रयोगाची माहिती 'लोकमत' कार्यालयात पाठवा.

पत्ता : सेठी हाईटस्, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अकोला ४४४ 00१, फोन (0२४) २४४२६६१ (ई-मेल :lokmatcityakola@gmail.com)

 - निवासी संपादक