शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

राष्ट्रसंतांचे विचार ऐकण्यापेक्षा कृतीत आणण्याची गरज

By admin | Updated: January 30, 2017 03:33 IST

राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात जनार्दन बोथे यांचे प्रतिपादन.

अकोला, दि. २९- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समजणे फार कठीण आहे. अनेक वर्ष मी त्यांच्या सहवासात घालविली; परंतु अद्यापही महाराज मला पूर्ण कळलेले नाही. आजही मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी आणि सुविचारी समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक साहित्यरचना केल्या. भजने लिहिली आणि समाजजागृतीचे कार्य केले; परंतु अद्यापही समाज जागा झालेला नाही. त्यामुळे आम्हाला अधिक गतीने कार्य करण्याची गरज आहे. राष्ट्रसंतांचे विचार ऐकण्यासोबतच कृतीत आणण्याची गरज आहे. असे मत अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे स्वराज्य भवन प्रांगणातील ऋषिवर्य घुसरकर महाराज साहित्य नगरीमध्ये आयोजित चौथ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचा समारोप करताना ते बोलत होते. विचारपीठावर माजी मंत्री गुलाबराव गावंडे, स्वागताध्यक्ष डॉ. अभय पाटील, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. भास्करराव विघे गुरुजी, नीरज खोसला, प्राचार्य काळे, डॉ. रघुनाथ वाडेकर, अँड. रामसिंग राजपूत आदी होते. जनार्दन बोथे म्हणाले, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य सर्वदूर पसरविण्याची गरज आहे आणि या कार्यातून समाजाचे प्रबोधन करून एक सशक्त समाज निर्माण व्हायला हवा. त्यासाठी संकल्प करण्याची गरज आहे. सद्य परिस्थिती समाजासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रसंतांचे विचार, त्यांचे साहित्यच समाजाला तारू शकते. एक बलशाली भारत निर्माण करण्याची ताकद राष्ट्रसंतांच्या विचारांमध्ये आहे, असेही जनार्दन बोथे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमामध्ये ग्रामगीताचार्य पदवी मिळविणारे कर्डीकर गुरुजी, वंदन कोहाडे, सौ. मानकर, रामकृष्ण गावंडे, सौ. खडतळकर, भरत राऊत आणि उत्कृष्ट कार्य करणार्‍या श्रृती देशमुख, सोनाली शर्मा, संदीप देशमुख, पत्रकार शिवाजी भोसले, विवेक मेतकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले, गोपाल गाडगे यांनी केले. आभार प्रा. डॉ. राजीव बोरकर यांनी मानले. सामुदायिक प्रार्थनेने विचार साहित्य संमेलनाची सांगता झाली. संस्कार, संस्कृती जपण्याची गरज- गुलाबराव गावंडे- समाजामध्ये बीभत्स वातावरण निर्माण झाले आहे. टीव्ही, मोबाइलमुळे महिला, तरुणींच्या वर्तनात, राहणीमानात बदल झाला आहे. एकप्रकारे अंगप्रदर्शन करून प्रतिष्ठा घालविण्याचे काम होत आहे. आपले संस्कार, संस्कृतीचा विचार समाजाला विसर पडत चाललाय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार, साहित्य समाजासाठी प्रेरक आहे. तरुण, तरुणींनी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अभ्यास करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी विचार साहित्य संमेलनात बोलताना केले.