शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

हरभरा, तूरपाठोपाठ मठाचे भाव कोसळण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:56 IST

फेब्रुवारी महिन्यात होलसेल बाजारातील मठाचे भाव ६८ रुपये किलोचे नोंदविले गेले आहे.

अकोला : गत तीन दिवसांत हरभरा, तूरपाठोपाठ मठाचे भाव कोसळण्याचे संकेत मिळत असल्याने अकोल्यातील बाजारपेठेत मठाची उचल थांबली आहे. राजस्थानातून येणारे मठ मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल होत असल्याने हा परिणाम होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. फेब्रुवारी महिन्यात होलसेल बाजारातील मठाचे भाव ६८ रुपये किलोचे नोंदविले गेले आहे. यात आठ ते दहा रुपयांची घसरण येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.बाजारपेठेतील धान्याचे भाव एकापाठोपाठ एक सातत्याने घसरत असल्याने अडते आणि धान्य व्यापारी हादरले आहेत; मात्र सर्वसामान्य जनतेला या उतरंडीचा चांगलाच दिलासा मिळत आहे. हरभरा आणि तुरीचे नवीन उत्पादन येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशातील हरभरा-तूर येत असल्याने मोठ्या प्रमाणात भाव पडले आहेत. यातून शेतकरी सावरत नाही तोच, मठाचे भावदेखील कोसळण्याचे संकेत मिळत आहे. राजस्थानात परिसरात यंदा मठाचे पीक चांगले असून, ते बाजारपेठेत दाखल होत आहे. त्यामुळे मठाचे भाव पडण्याची शक्यता आहे. मठाचे भाव कोसळ्याचे संकेत मिळाले असल्याने अकोला धान्य बाजारातील ठोक व्यापाऱ्यांनी मठाची नवीन खरेदी थांबविली आहे. मठाची उचल होत नसल्याने हा प्रकार समोर आला आहे. बाजारपेठेतील तज्ज्ञांनी व्यक्त केलेली शंका कितपत खरी ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार