शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार साहित्य संमेलन

By admin | Updated: November 7, 2014 00:53 IST

पूर्वतयारीनिमित्त पार पडला अकोला जिल्हा कार्यकर्ता मेळावा.

अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन १२ ते १४ डिसेंबरदरम्यान अकोल्यात आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रसंतांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजि त या साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी आकाशवाणीसमोरील जि.प. कर्मचारी भवनात जिल्हा कार्यकर्ता मेळावा पार पडला. ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक अँड. रामसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला प्रा. हरिभाऊ गहूकर, शंकरराव देशमुख, गोवर्धन खोवले, तिमांडे महाराज, भाई प्रदीप देशमुख, स्वागताध्यक्ष डॉ. गजानन नारे, अमोल मिटकरी, सुभाष जैन, किशोर बंड, प्रा. यादव वक्ते, मंडाले दादा, अँड. सुधाकर खुमकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, सुशील वणवे, प्रा. उदय देशमुख, विजय अग्रवाल, जयंत मसने, विठ्ठलराव लोथे, डॉ. संतोष हुशे, प्रतिभा अवचार, अंबादास उगले, कृष्णा अंधारे, नंदकिशोर पाटील, अँड. विनोद साखरकर, शरद वानखडे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अँड. संतोष भोरे यांनी प्रास्ताविकातून साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कृषी मेळावा, महिला मेळावा, बालकांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भजन-कीर्तन व सामुदायिक ध्यान प्रार्थना आदि कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार पोहोचविण्याच्या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाददेखील मिळतो. विचार साहित्य संमेलनासाठी समितीच्यावतीने तयार करण्यात आलेली रूपरेषा उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केली. तसेच संमेलनाच्या दृष्टीने विविध समित्यांचे गठण, तालुका मेळाव्यांची तयारी, तालुका कार्यकारिणींचे गठण, तालुका दौरे निश्‍चित करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.