शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

तेल्हारा येथे रानभाजी महोत्सव; तासाभरातच २७ हजारांची उलढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:23 IST

तेल्हारा: तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आत्मा यांच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन येथील पंचायत ...

तेल्हारा: तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आत्मा यांच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन येथील पंचायत समिती प्रांगणात करण्यात आले होते. या महोत्सवास तेल्हाराकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत, फक्त तासाभरातच सुमारे २७ हजार रुपयांची उलाढाल या महोत्सवात झाली.

या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे व उद्घाटक म्हणून उत्तम माधव नळकांडे गाडेगाव येथील देशी वृक्षलागवड करणारे निसर्गप्रेमी लाभले होते. रानभाज्या या मानवी शरीरात पोषण मूल्य वाढवणाऱ्या असून, त्यांचा मानवी आरोग्यावर चांगला परिणाम होतो. अशा भाज्या या पावसाळ्यात कुठल्याही प्रकारच्या बियाण्यांची लागवड न करता, तसेच कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी न करता, रानभाज्या आपोआप उगवतात. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी कोरोना महामारीत जगायचे असेल, तर आहार पद्धतीमध्ये बदल करून पारंपरिक रानभाज्या आहारात घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. निसर्गप्रेमी उत्तम नळकांडे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना निसर्गावर मात नाही, तर निसर्गाशी मैत्री करा, निसर्ग भरभरून देतो, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी नरेंद्र राठोड, गौरव राऊत आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, नीलेशकुमार नेमाडे, तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, कृषिमित्र आदी उपस्थित होते. महोत्सवाचे संचालन नीलेश नेमाडे यांनी, तर आभार मंडळ कृषी अधिकारी राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी विभागाचे सर्व कृषी सहायक गट सहायक यांनी परिश्रम घेतले.

-------------

या रानभाज्या केल्या खरेदी

आत्माअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक गट, तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी या महोत्सवात बाष्याचे कोम, फांदीची भाजी, केना, कुंजीर, अंबाडी, आंबट चुका, चिवळ इत्यादी रानभाज्या शहरातील रानभाज्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या. ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, रानभाज्या खरेदी केल्या.