शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

पाणीदार गावाकडे वाटचाल असलेले राजनापूर खिनखिनी होणार सुजलाम् सुफलाम्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:14 IST

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यातील राजनापूर खिनखिनी या गावात भारतीय जैन संघटना व ग्रामपंचायत राजनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ...

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यातील राजनापूर खिनखिनी या गावात भारतीय जैन संघटना व ग्रामपंचायत राजनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजनापूर येथील दोन नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले, राजनापूर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळला. नाला खोलीकरण झाल्याने व नाल्यावर सिमेंट बंधारे असल्याने हे पावसाचे पाणी त्या बंधाऱ्यांमध्ये साचल्याल्याने भविष्यात शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी दत्तक घेतलेले गाव म्हणून राजनापूर खिनखिनीची ओळख आहे. या गावात अनेक विकासकामांना वेग आला असून, अलीकडेच गावातील दोन मोठ्या नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे. नाला २० ते २२ फूट खोल असून, सध्या नाल्यात १० ते १५ फूट पाणी साचले आहे. गत आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने राजनापूर परिसरातल्या विहिरींची पातळी एक ते दोन फुटांनी वाढली असून, खरीप आणि रबी पिकांची चिंता या नाला खोलीकरणाने मिटल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय जैन संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिल्याने शेतकरी सुखावला आहे.

----------------------

पाणीटंचाई निवारण्यासाठी गाव सज्ज!

भारतीय जैन संघटनेच्या ‘सुजलाम् सुफलाम् अकोला’ या अभियानांतर्गत राजनापूर खिनखिनी परिसरातील शेत शिवार सुजलाम् सुफलाम् होणार आहे. यामुळे गावातील पाणी विहिरी व विंधन विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली असून, भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी गाव सज्ज झाले आहे. राजनापूर परिसरात या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न तडीस निघाला आहे.

-----------------------

‘मशीन आमची, डिझेल तुमचे!’

पहिल्याच पावसात नाले तुडुंब भरले आहेत. भारतीय जैन संघटनेमार्फत गेल्या दीड महिन्यापासून नाला खोलीकरणाचे व शेतकऱ्यांच्या शेतातील नाले दुरुस्ती, बांध बांधण्याचे काम करण्यात आले. 'मशीन आमची डिझेल तुमचे' या तत्त्वावर हे काम करण्यात आले असून, शेतकऱ्यांना अवघ्या ५० टक्के रकमेमध्ये हे काम करता आले. शेतामध्ये पावसाळ्यात नाल्याचे पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते या नाला खोलीकरणाने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. ज्या शेतकऱ्याकडे शेती सिंचनाची व्यवस्था नव्हती त्या शेतकऱ्यांना हा नाला आता वरदान ठरला आहे. खरिपासोबतच रबी हंगामात शेतकऱ्यांना सिंचन करणे शक्य होणार आहे.

- - - - - - - - -

गाव पाणीदार होण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया व जिल्हा व्यवस्थापन नितींजी राजवैद्य व पालकमंत्री बच्चू कडू यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या सहकार्याने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला आहे.

-प्रगती कडू, सरपंच, राजनापूर खिनखिनी