शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
5
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
6
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
7
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
8
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
9
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
10
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
11
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
12
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
13
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
14
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
15
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
16
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
17
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
18
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
19
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
20
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...

पाणीदार गावाकडे वाटचाल असलेले राजनापूर खिनखिनी होणार सुजलाम् सुफलाम्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:14 IST

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यातील राजनापूर खिनखिनी या गावात भारतीय जैन संघटना व ग्रामपंचायत राजनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ...

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यातील राजनापूर खिनखिनी या गावात भारतीय जैन संघटना व ग्रामपंचायत राजनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजनापूर येथील दोन नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले, राजनापूर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळला. नाला खोलीकरण झाल्याने व नाल्यावर सिमेंट बंधारे असल्याने हे पावसाचे पाणी त्या बंधाऱ्यांमध्ये साचल्याल्याने भविष्यात शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी दत्तक घेतलेले गाव म्हणून राजनापूर खिनखिनीची ओळख आहे. या गावात अनेक विकासकामांना वेग आला असून, अलीकडेच गावातील दोन मोठ्या नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे. नाला २० ते २२ फूट खोल असून, सध्या नाल्यात १० ते १५ फूट पाणी साचले आहे. गत आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने राजनापूर परिसरातल्या विहिरींची पातळी एक ते दोन फुटांनी वाढली असून, खरीप आणि रबी पिकांची चिंता या नाला खोलीकरणाने मिटल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय जैन संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिल्याने शेतकरी सुखावला आहे.

----------------------

पाणीटंचाई निवारण्यासाठी गाव सज्ज!

भारतीय जैन संघटनेच्या ‘सुजलाम् सुफलाम् अकोला’ या अभियानांतर्गत राजनापूर खिनखिनी परिसरातील शेत शिवार सुजलाम् सुफलाम् होणार आहे. यामुळे गावातील पाणी विहिरी व विंधन विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली असून, भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी गाव सज्ज झाले आहे. राजनापूर परिसरात या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न तडीस निघाला आहे.

-----------------------

‘मशीन आमची, डिझेल तुमचे!’

पहिल्याच पावसात नाले तुडुंब भरले आहेत. भारतीय जैन संघटनेमार्फत गेल्या दीड महिन्यापासून नाला खोलीकरणाचे व शेतकऱ्यांच्या शेतातील नाले दुरुस्ती, बांध बांधण्याचे काम करण्यात आले. 'मशीन आमची डिझेल तुमचे' या तत्त्वावर हे काम करण्यात आले असून, शेतकऱ्यांना अवघ्या ५० टक्के रकमेमध्ये हे काम करता आले. शेतामध्ये पावसाळ्यात नाल्याचे पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते या नाला खोलीकरणाने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. ज्या शेतकऱ्याकडे शेती सिंचनाची व्यवस्था नव्हती त्या शेतकऱ्यांना हा नाला आता वरदान ठरला आहे. खरिपासोबतच रबी हंगामात शेतकऱ्यांना सिंचन करणे शक्य होणार आहे.

- - - - - - - - -

गाव पाणीदार होण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया व जिल्हा व्यवस्थापन नितींजी राजवैद्य व पालकमंत्री बच्चू कडू यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या सहकार्याने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला आहे.

-प्रगती कडू, सरपंच, राजनापूर खिनखिनी