शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

राजगुरूंच्या संघर्षगाथेतून अकाेल्याच्या इतिहासाला मिळणार उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:30 IST

अकोला: भारतीय स्वातंत्र्ययुद्धात शहीद भगतसिंह यांच्याबरोबर फासावर गेलेले क्रांतिवीर राजगुरू यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘हुतात्मा शिवराम राजगुरू : एक ...

अकोला: भारतीय स्वातंत्र्ययुद्धात शहीद भगतसिंह यांच्याबरोबर फासावर गेलेले क्रांतिवीर राजगुरू यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘हुतात्मा शिवराम राजगुरू : एक धगधगती संघर्षगाथा’ या मराठी वेबसिरीजच्या माध्यमातून अकाेल्याच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासाला उजाळा मिळणार आहे. ऐतिहासिक वास्तव जगासमाेर मांडण्यासाठी राजगुरूंचे नातू विलास प्रभाकर राजगुरू त्यांच्यासह पाच जणांच्या टीमने अकाेल्यातील राजगुरूंच्या वास्तव्यासह चळवळीचा धांडाेळा घेतला.

स्वातंत्र्ययुद्धात ज्या क्रांतिकारकांनी जिवावर उदार होऊन महान कार्य केले, त्यामध्ये शिवराम राजगुरू यांचे नाव अग्रस्थानी आहे. सध्याच्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख होण्याच्या उद्देशाने ओटीटी व्यासपीठाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक दस्तावेज वेबसिरीजच्या माध्यमातून समाेर येत आहे. ही वेबसिरीज म्हणजे स्वातंत्र्यचळवळीत ज्या क्रांतिकारकांनी अनन्वित अत्याचार सहन करून हसत-हसत बलिदान केले त्यांना आदरांजली अर्पण करणारी आहे. पुणे जिल्ह्यातील खेड (आताचे राजगुरूनगर) येथे जन्मलेले शिवराम हरी राजगुरू क्रांतिकारक कसे झाले, यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, अशी माहिती या निमित्ताने समाेर येत आहे. अकाेल्यातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा चिरंतन ठेवा आहे. इतिहासाच्या साेनेरी पानात अकाेल्याचा इतिहास दडलेला आहे. हा इतिहास युवकांसमाेर, नव्या पिढीसमाेर आणण्यासाठी आमची धडपड असल्याचा आशावाद टीमने व्यक्त केला.

‘राजगुरू’ वेबसिरीज मराठी, हिंदी, तमिळ, पंजाबी, तेलगू भाषेत तयार होणार आहे. याची मूळ संकल्पना-विलास राजगुरू यांची असून, लेखक- आशीष निनगुरकर आहेत तर कार्यकारी निर्माते-प्रतिश सोनवणे, कलावंत- प्रदीप कडू, प्रॉडक्शन मॅनेजर-सुनील जाधव, कॅमेरामन- सिद्धेश दळवी आदींनीही या स्थळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही संशोधनासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली.

अकाेल्याचा ऐतिहासिक ठेवा

शहरातील बाबूजी देशमुख वाचनालयातील राजगुरूंनी वाचन केलेली जागा आणि समोरच्या गॅलरीतून फिरताना कोतवालीवर ठेवल्या जाणारी पाळत, राजराजेश्वर मंदिर परिसरातील साठे यांचा तेव्हाचा वाडा ज्यात राजगुरू स्वतः मुक्कामी होते. सावजी यांचे घर जेथे राजगुरूंनी रात्रभर झोपून सकाळी पुण्याला रवाना झाले होते, यासह विविध आठवणींना उजाळा मिळणार आहे.

——————

हेच त्रिमूर्तींना खरे अभिवादन

अनेक क्रांतिकारांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्याचे मोजमाप आपण करू शकत नाही. म्हणून या त्यांच्या विचारांचा मागोवा घेऊन वाटचाल करणे हीच या त्रिमूर्तींना खरे अभिवादन ठरेल, अशा आशावाद यांचे नातू विलास राजगुरू यांनी व्यक्त केला.