शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

रायपूरच्या साखर व्यापाऱ्याची अकोल्यात २३ लाखांनी फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:32 IST

खंडेलवाल याने तीन ते चार दिवसांमध्ये साखर पोहोचेल, असे त्यांना सांगितले; मात्र साखर न मिळाल्याने त्यांनी संतोष खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी टाळाटाळ सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रायपूर येथील एका व्यापाºयाकडून साखर विकण्याच्या व्यवहारासाठी अकोल्यातील व पुण्यातील एजंटने ३५ लाख ४८ हजार रुपये घेतले होते; परंतु साखर खरेदीचा व्यवहार न झाल्यामुळे दोन्ही एजंटने ८ लाख ३७ हजार ५00 रुपये परत केले. उर्वरित रकमेची मागणी केली असता, दोन्ही एजंट रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने, अखेर कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.रायपूर येथील नीरज रमेशलाल रमाजी यांच्या तक्रारीनुसार ते साखर विक्रीचा व्यवसाय करतात. बालाजी शुगर एजन्सीचे संचालक आरोपी संतोष मोहनलाल खंडेलवाल (अकोला) आणि अभय चोरडिया (पुणे) यांनी २0१४ मध्ये नीरज रमाजी यांच्यासोबत संपर्क साधून दोन टक्के कमिशन दराने साखर देत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्यात तीन वेळा साखर खरेदीचा व्यवहार झाला. त्यानंतर २0१६ मध्ये संतोष खंडेलवाल याने शंभू महादेव शुगर अ‍ॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज, उस्मानाबाद येथून कमी दराने साखर खरेदी करून देण्याचे सांगितले. नीरज रमाजी यांनी विश्वास ठेवून अग्रिम रक्कम ३५ लाख ४८ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. खंडेलवाल याने तीन ते चार दिवसांमध्ये साखर पोहोचेल, असे त्यांना सांगितले; मात्र साखर न मिळाल्याने त्यांनी संतोष खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी टाळाटाळ सुरू केली. तसेच संबंधित साखर कारखान्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यांनी आरोपीला रक्कम मागितली असता, आरोपीने २८ मार्च २०१७ रोजी ८ लाख ३७ हजार ५०० रुपये परत केले. त्यानंतर आरटीजीएसने २ लाख ५० हजार व धनादेश २५ डिसेंबर २०१८ ला दिला आणि उर्वरित २३ लाख ६० हजार ५०० रुपये देण्यासाठी अवधी मागितला. त्यानंतरही आरोपीकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने तक्रारदार नीरज रमाजी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालयाने आरोपी संतोष खंडेलवाल, अभय चोरडिया यांच्याविरुद्ध भादंवि ४२०,४०९, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)

टॅग्स :Akolaअकोलाfraudधोकेबाजी