शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पावसाळा तोंडावर; पाणीटंचाई निवारणाची कामे कागदावर

By admin | Updated: May 29, 2014 01:18 IST

१२२ गावांमधील ८९ उपाययोजनांच्या कामांना मंजुरी बाकी

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांपैकी आतापर्यंत केवळ ३६ गावांमध्ये ३७ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित  ८९ उपाययोजनांच्या कामांना अद्यापही प्रशासकीय मंजुरी मिळणे बाकी आहे. प्रशासकीय मंजुरीप्राप्त कामेदेखील अद्याप सुरू करण्यात आली नाही.त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असला तरी, यावर्षी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे.तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात तीव्र पाणीटंचाईची परिस्थती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १५८ गावांमध्ये १२५ उपाययोजनांची कामे पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या या कामांसाठी २ कोटी ८६ लाख २० हजारांचा खर्चदेखील प्रस्तावित करण्यात आला. मात्र पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी २८ मे पर्यंत जिल्ह्यातील एकूण ३६ गावांमध्ये ३७ उपाययोजनांच्या कामांसाठी जिल्हाधिकार्‍यांकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. परिणामी मंजुरीप्राप्त कामेदेखील अद्याप सुरू करण्यात आली नसल्याचे चित्र आहे. पावसाळा सुरू होण्यास केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर, पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाही; मात्र पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यातील प्रस्तावित एकूण उपाययोजनांच्या कामांपैकी आतापर्यंत केवळ ३६ गावांमध्ये ३७ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, उर्वरित १२२ गावांमधील ८९ उपायोजनांच्या कामांना जिल्हाधिकार्‍यांकडून प्रशासकीय मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे. या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची कामे, त्यापैकी प्रत्यक्षात आतापर्यंत कामांना मिळालेली मंजुरी आणि मंजुरी मिळाली असली तरी, प्रत्यक्षात कामे सुरू असल्याची स्थिती आणि उर्वरित गावांमधील उपाययोजनांच्या कामांना बाकी असलेली मंजुरी लक्षात घेता, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या विविध उपाययोजनांची कामे कागदावरच असल्याचे चित्र आहे.