शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

प्रदीर्घ खंडानंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन

By रवी दामोदर | Updated: September 5, 2023 23:16 IST

जिल्ह्यात गत दीड महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली.

अकोला : जिल्ह्यात गत दीड महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला असून, कोमजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यात रात्रीच्या वेळी दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीला वेग येणार आहे.

खरिपाच्या पेरण्या एक महिना उशिरा प्रारंभ होऊन पेरण्या पूर्ण होताच जुलैच्या अखेरीस चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली होती. दि.५ सप्टेंबर रोजी रात्रीच्यावेळी पावसाने विजांच्या कडकडाटात दमदार हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यातील आगर, उगवा, घुसर, खरप, तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील कंझारा परिसरात जोरदार पाऊस झाला.

९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’

मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात ४.५ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्याच्या प्रभावाने ९ सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात दि. ९ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम, तसेच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने आगामी चार दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.