शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; ढोरखेड्यात घरांची पडझड

By admin | Updated: September 18, 2015 00:21 IST

एका महिलेचा मृत्यू; बेघरांना जिल्हा परिषद शाळेत हलविले.

वाशिम : गत एका महिन्यांपासून फितूर झालेला पाऊस १७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजतानंतर वाशिम जिल्ह्यात सर्वदूर बसरला. या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, वादळवारा आणि पावसामुळे मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील ३0 ते ३५ घरांची पडझड झाली असून सात ते आठ जण जखमी झाले आहेत. एका जखमीचा उपचारादरम्यान रात्री उशीरा मृत्यू झाला. सखुबाई कुंडलिक सावळे असे मृतक महिलेचे नाव आहे. मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या अपेक्षा उंचाविल्या होत्या. या पावसाच्या भरोशावर शेतकर्‍यांनी तातडीने पेरण्या आटोपल्या. २९ जूनपर्यंत पावसाने कमी-अधिक प्रमाणात सातत्य राखले. २९ जूननंतर रिमझिम पावसाचा अपवाद वगळता दमदार पाऊस झाला नाही. त्यानंतर ४ ते ८ ऑगस्टदरम्यान पावसाने हजेरी लावून परत दीर्घ रजा घेतली. तेव्हापासून गायब झालेला पाऊस १५ सप्टेंबरपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात बरसत आहे. १५ सप्टेंबरला रात्रीदरम्यान जिल्ह्यात ११.७७ च्या सरासरीने एकूण ७0.६0 मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. रिसोड तालुक्यात ३८ मीमी, मालेगाव तालुका १८.२0 मीमी, मंगरुळपीर तालुका १,४0 मीमी व मानोरा तालुक्यात १३ मीमी पाऊस पडला होता. बुधवारी उसंत देणार्‍या पावसाने गुरूवारी दुपारनंतर दमदार हजेरी लावली. सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस असल्याने बळीराजा सुखावला आहे. सुकून जाणार्‍या सोयाबीनला या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा अशा सर्व तालुक्यात गुरूवारी दुपारच्या सुमारास सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस झाल्याने चिंतेत असणार्‍या शेतकर्‍यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे जलाशयांमधील जलसाठय़ात वाढ होण्याचा अंदाज जलसिंचन विभागाने वर्तविला आहे. रिसोड व मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने रब्बी पिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रात्री ७ वाजतानंतर पावसाचा जोर आणखी वाढला होता. अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला.

*महिला दगावली

        शिरपूर जैन येथून जवळच असलेल्या ढोरखेडा येथे वादळवारा आणि पावसामुळे घरांची पडझड झाली. गावातील बौद्ध व धनगर वेटाळातील जवळपास ३0 ते ३५ घरांची पडझड झाली. घराच्या पडझडीत सात ते आठ जण जखमी झाले. सखूबाई कुंडलिक सावळे यांच्या डोक्याला टिनपत्र्याचा जबर मार लागल्याने त्यांना वाशिम येथे उपचारार्थ हलविले. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. गावातील अमोल सावळे, बळीराम मिटकरी, नारायण सावळे यांच्यासह सात ते आठ जण जखमी असून त्यांच्यावर शिरपूरात उपचार सुरू आहे. घरांची पडझड झालेल्या नागरिकांची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाने केल्या. या कुटुंबाला खिचडी व अन्य भोजन देण्याच्या सूचनाही दिल्या. तहसीलदार सोनाली मेटकरी, तलाठी वाघ, पोलीस उपनिरिक्षक गिरीश तोगरवार, मंगेश गोपनारायण, प्रकाश भगत, मोरे आदींनी ढोरखेड्याला भेट दिली.