शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अवकाळी पावसाने लाखो हेक्टरवरील कापूस भिजला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 15:25 IST

अगोदरच कापसाचे उत्पादन घटले आहे. पुन्हा हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : निसर्गाच्या लहरीपणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, शेतकऱ्यांवर हीसंकटाची मालिकाच सुरू आहे. गत दोन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्याने लाखो हेक्टर शेतातील कापूस भिजला आहे. अगोदरच कापसाचे उत्पादन घटले आहे. पुन्हा हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे; परंतु सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने पेरणीस विलंब झाला. हे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असतानाही सतत पाऊस सुरू होता. त्याचा परिणाम कापूस उत्पादनावर झाला असून, उतारा घटला आहे. सध्या कापूस वेचणी सुरू आहे; पण पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. गत चोवीस तासांत गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. मध्य महाराष्टÑ व मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडला आहे. या पावसाने कापूस पीक तर भिजलेच तूर पिकावरही परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.विदर्भात १७ लाख ४९ हजार ९५ हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असून, कापूस पीक भिजले आहे. त्यामुळे कापसाची प्रत खराब होणार असल्याने भिजलेला कापूस ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर अगोदरच ८ टक्के आर्द्रता व इतर निकष लावून कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे भिजलेला कापूस व्यापाºयांनाच विकावा लागणार असल्याने भाव किती मिळतात, हा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. अकोला जिल्ह्यात बुधवारी रात्री १२ ते २.३० वाजतापर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे या जिल्ह्यातील कापूस चांगलाच भिजला आहे.या सर्व विषम वातावरणामुळे कीड, रोगाचा प्रादुर्भावही वाढला असून, कपाशीवर गुलाबी बोंडअळी तर तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तूर पीक यावर्षी बºयापैकी आले आहे; परंतु निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकालाही बसत आहे.शेतकºयांनी काळजी घेण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून देण्यात येत असल्याचे कृषी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती