शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने लाखो हेक्टरवरील कापूस भिजला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 15:25 IST

अगोदरच कापसाचे उत्पादन घटले आहे. पुन्हा हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : निसर्गाच्या लहरीपणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, शेतकऱ्यांवर हीसंकटाची मालिकाच सुरू आहे. गत दोन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्याने लाखो हेक्टर शेतातील कापूस भिजला आहे. अगोदरच कापसाचे उत्पादन घटले आहे. पुन्हा हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे; परंतु सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने पेरणीस विलंब झाला. हे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असतानाही सतत पाऊस सुरू होता. त्याचा परिणाम कापूस उत्पादनावर झाला असून, उतारा घटला आहे. सध्या कापूस वेचणी सुरू आहे; पण पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. गत चोवीस तासांत गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. मध्य महाराष्टÑ व मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडला आहे. या पावसाने कापूस पीक तर भिजलेच तूर पिकावरही परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.विदर्भात १७ लाख ४९ हजार ९५ हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असून, कापूस पीक भिजले आहे. त्यामुळे कापसाची प्रत खराब होणार असल्याने भिजलेला कापूस ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर अगोदरच ८ टक्के आर्द्रता व इतर निकष लावून कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे भिजलेला कापूस व्यापाºयांनाच विकावा लागणार असल्याने भाव किती मिळतात, हा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. अकोला जिल्ह्यात बुधवारी रात्री १२ ते २.३० वाजतापर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे या जिल्ह्यातील कापूस चांगलाच भिजला आहे.या सर्व विषम वातावरणामुळे कीड, रोगाचा प्रादुर्भावही वाढला असून, कपाशीवर गुलाबी बोंडअळी तर तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तूर पीक यावर्षी बºयापैकी आले आहे; परंतु निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकालाही बसत आहे.शेतकºयांनी काळजी घेण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून देण्यात येत असल्याचे कृषी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती