शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: सर्वात मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
2
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
4
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
5
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
6
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
7
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
8
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
9
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
10
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
11
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
12
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
13
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
15
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
16
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
17
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
18
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
19
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
20
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

पावसाची दडी, धान संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 21:46 IST

दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने धान पीक संकटात आले आहेत. जमिनीला तडे जात असून पाण्याअभावी शेतातील धानाची कोवळी रोपटी सुकू लागली. तर काही तालुक्यात खोड कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. सुरूवातीला रोवणी झालेल्या पिकांची स्थिती उत्तम असली तरी १५ जुलैनंतर रोवणी झालेल्या धानाला मात्र पावसाच्या दडीचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देजमिनीला भेगा : रोपटी सुकू लागली, आठ दिवसात पाऊस न आल्यास उत्पन्नावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने धान पीक संकटात आले आहेत. जमिनीला तडे जात असून पाण्याअभावी शेतातील धानाची कोवळी रोपटी सुकू लागली. तर काही तालुक्यात खोड कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. सुरूवातीला रोवणी झालेल्या पिकांची स्थिती उत्तम असली तरी १५ जुलैनंतर रोवणी झालेल्या धानाला मात्र पावसाच्या दडीचा फटका बसत आहे.जिल्ह्यात एक लाख ८२ हजार हेक्टर धान लागवट क्षेत्र आहे. यंदा सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सुमारे ८५ टक्के धानाची रोवणी आटोपली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३० मिमी आहे. १ जून ते २२ जुलैपर्यंत सरासरीच्या ८७ टक्के पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ५८०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र २३ जुलैपासून पावसाने दडी मारली. दहा दिवसात पावसाची एक सरही कोसळली नाही. या दडीचा परिणाम शेतीवर होत आहे.जिल्ह्यात सुरूवातीला पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. परंतु १५ जुलैनंतर रोवणी झालेले भात पीक सध्या धोक्यात आले आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांची परिस्थिती चांगली आहे. परंतु निसर्गावर अवलंबुन असलेल्या शेतांमध्ये दुष्परिणाम दिसू लागल ेआहेत. अनेक शेतात आता भेगा पडत आहे. आठ दिवसात पाऊस आला नाही तर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच भेगांचा परिणाम पिकांवर होवू नये यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता असते. विशेष म्हणजे गतवर्षी पावसाने ताण दिल्याने आॅगस्टच्या शेवटपर्यंत रोवणी गेली होती. मात्र यंदा सुरूवातीला पाऊस झाल्याने जुलैच्या शेवटपर्यंत जिल्ह्यात सुमारे ८५ टक्के पेरणी झाली आहे. आता पावसाअभावी धानाचे पीक पिवळसर पडत आहे. काही भागात वाढत्या तापमानामुळे पीके सुकू लागली आहे. गत आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम कीडींचा प्रादूर्भाव वाढविण्यात झाला आहे. काही भागात खोड कीडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. आर्थिक नुकसान पातळीवर खोडकीडी सध्या नसली तरी पावसाने आणखी ताण दिल्यास कीडींचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे.धान पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात गरज असते. परंतु दहा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनातून शेततलाव तयार करण्यात आले आहे. या शेततलावाचे पाणी धान पीकासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.धान उत्पादक शेतकºयांच्या हृदयाचे ठोके वाढले असून पावसाने आणखी ताण दिल्यास पीक हातचे जाण्याची शक्यता आहे. सर्वांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहे. मात्र जो दिवस उगवतो तो चक्क प्रकाश घेवूनच.वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणामपावसाच्या दडीमुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हाळ्यासारखे उकळत असून दमट वातावरणामुळे जीव घाबरा होत आहे. तसेच विषानुजन्य आजार बळावले आहेत. ग्रामीण भागात ताप, सर्दी, खोकला आदी आजार वाढले असून शासकीय रुग्णालयात अशा रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.पावसाने दडी मारल्याने शेतीसोबत माणवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. उशिरा पेरणी करणाºयांची शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. येत्या आठ दिवसात पाऊस आला नाही तर त्याचा उत्पादनावर परिणाम होवू शकतो.-डॉ. जी.पी. श्यामकुंवर, भात उत्पादक शेतकरी, साकोली.वाढत्या तापमानामुळे काही भागातील पीके सुकायला लागली आहेत. जिल्ह्यात २० टक्के पेरण्या बाकी आहे. पाण्याची सोय नसलेले शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.-डॉ. उषा डोंगरवार, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख, साकोली.