शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

परतीच्या पावसाने राज्यातील जलसाठय़ात वाढ!

By admin | Updated: September 24, 2015 01:03 IST

पश्‍चिम विदर्भातील स्थिती चिंताजनकच.

अकोला: परतीच्या पावसाने राज्यातील धरणांच्या जलसाठय़ात अल्पशी वाढ झाली आहे; परंतु मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भात अद्याप पूरक पाऊस झाला नसल्याने या दोन्ही विभागासह कोकण, नाशिक, पुणे व राज्यातील इतर भागाला दमदार परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यातील धरणांच्या जलसाठय़ात आजमितीस ५४ टक्के जलसाठा आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर निर्माण होईलच, शिवाय यावर्षी सिंचनालाही पाणी मिळणार नाही. परतीच्या पावसाचे दिवस सुरू झाल्यावर पाऊस प्रणाली पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस बरसला. चार महिन्यांच्या पावसाळ्य़ा प्रथमच काही भागात नदी, नाले दुथडी भरू न वाहून गेले. लहान-मोठय़ा धरणांच्या जलसाठय़ात वाढ झाली, सिमेंट नाला बांध, लघू पाटंबधार्‍यात पाणी संचय झाला. मराठवाडा विभागात केवळ ३४.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) आणि पश्‍चिम विदर्भातील धरणसाठय़ात ७0.२९ अब्ज घनफूट जलसाठा आहे; परंतु मराठवाड्यातील काही जिल्हे व अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या जिल्हय़ातील धरणांच्या जलसाठय़ाची स्थिती तेवढी समाधानकारक नाही; या तीन जिल्हय़ात सरासरी ३५ ते ४0 टक्के जलसाठा आहे. अमरावती विभागातील सर्व प्रकारच्या ६४0 प्रकल्पांत ७0.२९ अब्ज घनफूट (टीएमसी) जलसाठा आहे. या विभागात ९ मोठे सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत ३८.२३ अब्ज घनफूट (७८ टक्के), २३ मध्यम प्रकल्पांत १५.६४ अब्ज घनफूट (६७ टक्के), ४२८ लघू प्रकल्पात १५.३६ अब्ज घनफूट म्हणजेच ५0 टक्के जलसाठा आहे. नागपूर विभागात सर्व प्रकल्प मिळून १११.८८ अब्ज घनफूट (७९ टक्के) जलसाठा आहे. मराठवाड्यातील उजणी धरणात मृत जलसाठा होता, यामध्ये अल्पशी वाढ झाली आहे. कोयना धरणात ७५ टक्के जलसाठा आहे. पुणे आणि नाशिक विभागातही पूरक पाऊस झाला नसल्याने या विभागात आजमितीस केवळ ५१ टक्के जलसाठा आहे. दरम्यान, मराठवाडा विभागात ३४.३५ अब्ज घनफूट, कोकण विभाग ५१.६९ अब्ज घनफूट, नागपूर विभागात ७0.२९ अब्ज घनफूट, नाशिक विभाग ८५.८६ अब्ज घनफूट, पुणे १९५.६६ अब्ज घनफूट व राज्यातील इतर प्रकल्पात १८३.१४ अब्ज घनफूट जलसाठा आहे. राज्यात आजमितीस केवळ ५४ टक्के जलसाठा आहे. काटेपूर्णा प्रकल्पाची एकूण पातळी (साडेतीन टीएमसी) अब्ज घनफूट आहे. एक टीएमसी म्हणजे २८.३२ दलघमी; परंतु काटेपूर्णा धरणात २५.३0 दलघमी जलसाठा आहे. म्हणजेच एक टीएमसीदेखील या धरणात पाणी नाही. इतर प्रकल्पात पाणी साठा अल्प आहे. त्यामुळे परतीच्या दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचे अकोला येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी स्पष्ट के ले.