शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

पाऊस रुसला, शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: June 29, 2014 00:52 IST

पावसाने दडी दिल्याने पेरणीला विलंब होत असून, हा हंगाम हातचा जातो की काय, अशी चिंता गावागावात शेतकरी व्यक्त करीत आहेत.

अकोला: जून महिना संपत आला तरी अद्याप पाऊस पडलेला नाही. पावसाने दडी दिल्याने पेरणीला विलंब होत असून, हा हंगाम हातचा जातो की काय, अशी चिंता गावागावात शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाच्या विलंबामुळे बाजारपेठही प्रभावित झाली असून, महागाई वाढत आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊन एक महिना झाल्यावरही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्हय़ातील पेरण्या खोळंबल्या आहे. गतवर्षी एक जूनपासून पावसाला प्रारंभ झाला होता. त्यामुळे जूनअखेरपर्यंत कपाशी व सोयाबीनचे पीक पात्यावर आले होते. पेरणीला विलंब झाला तर उत्पादनात प्रचंड घट येते. परिणामी शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागतो. उडीद, मूग पिकाची पेरणी २0 जूनच्या आत झाली तर पिके चांगली येतात. पावसाच्या दडीमुळे यावर्षी हायब्रीड, ज्वारी, उडीद, मुगाची पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली असून, आता केवळ कपाशी व सोयाबीनवर शेतकर्‍यांची मदार आहे. त्यातही आणखी आठवडाभर पाऊस आला नाही तर या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. गतवर्षी एक जूनपासूनच पावसाला प्रारंभ झाला होता. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांनी मे महिन्यातच शेतीची कामे आटोपली असून, बियाणे व खताची खरेदी केली आहे. शेतकरी पेरणीसाठी सज्ज असून, दररोज शेतात जाऊन शेताची पाहणी करीत आहेत. अनेक अल्पभूधारक शेतकरी दुसर्‍यांच्या शेतात जाऊन काम करीत आहेत. शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे. गावागावांमध्ये चिंतामय वातावरण असून, पाऊस कधी येईल, याचीच चर्चा रंगत आहे.