शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पाऊस रुसला, शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: June 29, 2014 00:52 IST

पावसाने दडी दिल्याने पेरणीला विलंब होत असून, हा हंगाम हातचा जातो की काय, अशी चिंता गावागावात शेतकरी व्यक्त करीत आहेत.

अकोला: जून महिना संपत आला तरी अद्याप पाऊस पडलेला नाही. पावसाने दडी दिल्याने पेरणीला विलंब होत असून, हा हंगाम हातचा जातो की काय, अशी चिंता गावागावात शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाच्या विलंबामुळे बाजारपेठही प्रभावित झाली असून, महागाई वाढत आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊन एक महिना झाल्यावरही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्हय़ातील पेरण्या खोळंबल्या आहे. गतवर्षी एक जूनपासून पावसाला प्रारंभ झाला होता. त्यामुळे जूनअखेरपर्यंत कपाशी व सोयाबीनचे पीक पात्यावर आले होते. पेरणीला विलंब झाला तर उत्पादनात प्रचंड घट येते. परिणामी शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागतो. उडीद, मूग पिकाची पेरणी २0 जूनच्या आत झाली तर पिके चांगली येतात. पावसाच्या दडीमुळे यावर्षी हायब्रीड, ज्वारी, उडीद, मुगाची पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली असून, आता केवळ कपाशी व सोयाबीनवर शेतकर्‍यांची मदार आहे. त्यातही आणखी आठवडाभर पाऊस आला नाही तर या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. गतवर्षी एक जूनपासूनच पावसाला प्रारंभ झाला होता. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांनी मे महिन्यातच शेतीची कामे आटोपली असून, बियाणे व खताची खरेदी केली आहे. शेतकरी पेरणीसाठी सज्ज असून, दररोज शेतात जाऊन शेताची पाहणी करीत आहेत. अनेक अल्पभूधारक शेतकरी दुसर्‍यांच्या शेतात जाऊन काम करीत आहेत. शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे. गावागावांमध्ये चिंतामय वातावरण असून, पाऊस कधी येईल, याचीच चर्चा रंगत आहे.